Generated by Rank Math SEO, this is an llms.txt file designed to help LLMs better understand and index this website. # Kisanwani: आवाज.. शेती, माती & संस्कृतीचा! ## Sitemaps [XML Sitemap](https://kisanwani.com/sitemap_index.xml): Includes all crawlable and indexable pages. ## Posts - [सोयाबीन & भुईमूग पिकातील रूंद व अरूंद पानांच्या तणांमुळे उत्पादन घटतेय? तणनाशक वापरूनही तणे मरत नाहीत? मग जाणून घ्या ‘हा’ प्रभावी उपाय| VOSTRIX Herbicide](https://kisanwani.com/vostrix-herbicide-soybean-groundnut-weed-control/): किसानवाणी | सोयाबीन आणि भुईमूग ही महाराष्ट्रातील महत्त्वाची खरीप पिके आहेत. मात्र या दोन्ही पिकांमध्ये सुरुवातीच्या वाढीच्या काळात तणांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्यास उत्पादनात लक्षणीय घट होऊ शकते. अनेक शेतकरी तणनाशकाची फवारणी करूनही अपेक्षित परिणाम मिळत नसल्याची तक्रार करतात. अशावेळी नेमकी चूक कुठे होते आणि प्रभावी तण नियंत्रणासाठी कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावे, हे समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. - [मोठी बातमी! मागील कर्जमाफीतील शेतकऱ्यांनाही आता ₹2 लाखांपर्यंत कर्जमाफी; सरकारचा मोठा निर्णय | Maharashtra Farm Loan Waiver Devendra Fadnavis](https://kisanwani.com/maharashtra-farm-loan-waiver-devendra-fadnavis/): किसानवाणी : राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारा महत्त्वाचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Maharashtra Farm Loan Waiver Devendra Fadnavis) यांनी विधानसभेत जाहीर केला आहे. महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ यापूर्वी घेतलेल्या शेतकऱ्यांनाही आता ५० हजार रुपयांऐवजी दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली. विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला. - [बोगस फळरोप विक्रेत्यांना मोठा दिलासा? पहिल्या गुन्ह्यात आता कारावास नाही; नवा कायदा मंजूर | Fruit Sapling Sales Amendment Bill](https://kisanwani.com/fruit-sapling-sales-amendment-bill/): किसानवाणी : राज्यातील फळरोप विक्री व्यवसायाशी संबंधित कायद्यात महत्त्वपूर्ण बदल करणारे 'महाराष्ट्र फळांचे रोपमळे आणि फळांच्या रोपांची विक्री (नियमन) (सुधारणा) विधेयक, २०२६'(Fruit Sapling Sales Amendment Bill) राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत शुक्रवारी (ता. १०) मंजूर करण्यात आले. या सुधारणेनुसार फळरोपांच्या विक्रीतील प्रथमच झालेल्या किरकोळ आणि तांत्रिक स्वरूपाच्या उल्लंघनांसाठी कारावासाची शिक्षा रद्द करण्यात आली असून त्याऐवजी आर्थिक दंडाची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, नियमांचे वारंवार उल्लंघन करणाऱ्या तसेच बोगस फळरोपांची विक्री करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई करण्यासाठी दंड आणि शिक्षेच्या तरतुदी अधिक कडक करण्यात आल्या आहेत. - [Forest Right Act | 1 लाखांहून अधिक वनहक्कधारकांना अजूनही मिळाला नाही Farmer ID; अनुदानासह अनेक योजनांवर परिणाम](https://kisanwani.com/forest-right-act/): किसानवाणी : राज्यातील वनहक्क पट्टेधारक शेतकऱ्यांना ‘शेतकरी ओळख क्रमांक’ अर्थात Farmer ID (Forest Right Act) देण्याचे काम अपेक्षित वेगाने होत नसल्याचे समोर आले आहे. परिणामी, एक लाखाहून अधिक वनहक्कधारक शेतकरी अद्याप ‘एफआयडी’पासून वंचित असून, भविष्यातील विविध शासकीय योजनांचा लाभ मिळविण्यासाठी त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. क्षेत्रीय स्तरावरील समन्वयाचा अभाव, डिजिटल नोंदींची कमतरता तसेच तांत्रिक अडचणी यामुळे ही प्रक्रिया संथ गतीने सुरू असल्याचे चित्र आहे. - [कर्जमाफीत मोठा बदल! दोन जाचक अटी रद्द; लाखो शेतकऱ्यांना मिळणार मोठा दिलासा | Farm Loan Waiver Maharashtra Sharad Pawar](https://kisanwani.com/farm-loan-waiver-maharashtra-sharad-pawar/): किसानवाणी : राज्य सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती (Farm Loan Waiver Maharashtra Sharad Pawar) योजनेत मोठा बदल करत दोन महत्त्वाच्या अटी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत ही घोषणा केली. या निर्णयाचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांनी स्वागत करत राज्य सरकारचे आभार मानले आहेत. तसेच विविध शेतकरी संघटना आणि त्यांच्या नेत्यांनीही हा निर्णय शेतकरी आंदोलनाचा मोठा विजय असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. - [पावसानंतर कपाशीवर मुळकुज रोगाचा वाढता धोका; ‘ही’ लक्षणे दिसताच तातडीने करा उपाय | Cotton Root Rot Cotton Disease](https://kisanwani.com/cotton-root-rot-cotton-disease/): किसानवाणी : राज्यात बहुतांश भागात नुकताच समाधानकारक पाऊस झाला असून सध्या अनेक ठिकाणी पावसाने उघडीप दिली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार काही भागांत पावसाचा खंड पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशा बदलत्या हवामानाचा परिणाम कपाशी पिकावरही होऊ शकतो. विशेषतः पावसानंतर अचानक उष्ण आणि कोरडे वातावरण निर्माण झाल्यास कपाशीमध्ये मुळकुज रोगाचा (Cotton Root Rot Cotton Disease) प्रादुर्भाव वाढण्याचा धोका असतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी कपाशीच्या शेताची नियमित पाहणी करून रोगाची सुरुवातीची लक्षणे ओळखणे आणि वेळेत नियंत्रण उपाय करणे अत्यंत आवश्यक आहे. - [फळपीक विम्यासाठी अर्जाची शेवटची संधी! 14 जुलैपर्यंत करा अर्ज, नाहीतर मिळणार नाही लाभ | Crop Insurance PMFBY](https://kisanwani.com/crop-insurance-pmfby/): किसानवाणी : बदलत्या हवामानामुळे फळबागांचे वाढते नुकसान लक्षात घेता शेतकऱ्यांनी फळपीक विमा (Crop Insurance PMFBY) योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका कृषी विभागाने केले आहे. अवकाळी पाऊस, गारपीट, वादळी वारे, पावसाचा खंड तसेच वाढते तापमान यांसारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे फळपिकांच्या उत्पादनावर मोठा परिणाम होत असून शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत वर्ष २०२६ साठी फळपीक विमा योजना राबविण्यात येत असून पात्र शेतकऱ्यांनी विहित मुदतीत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. - [पीक उत्पादन वाढवायचे आहे? खतांच्या पायाभूत मात्रेचा हा शास्त्रीय नियम जाणून ‘घ्या’ | Fertilizer Management Basal Dose](https://kisanwani.com/fertilizer-management-basal-dose/): किसानवाणी : पीक उत्पादन वाढविणे, उत्पादनाचा दर्जा सुधारणे आणि जमिनीची सुपीकता दीर्घकाळ टिकवून ठेवणे यासाठी संतुलित खत व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. खतांचा योग्य वेळी, योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने वापर केल्यास पिकांना आवश्यक अन्नद्रव्यांचा पुरवठा योग्य प्रकारे होतो. या सर्व प्रक्रियेत पेरणीपूर्वी किंवा पेरणीच्या वेळी जमिनीत दिली जाणारी पायाभूत मात्रा (Fertilizer Management Basal Dose) ही खत व्यवस्थापनातील सर्वात महत्त्वाची आणि शास्त्रीय पद्धत मानली जाते. - [आजचे बाजारभाव: सोयाबीन तेजीत, लसणाच्या दरात मोठी घसरण; कापूस, आले आणि डाळिंबाची स्थिती काय? | Maharashtra Agriculture Agri Market](https://kisanwani.com/maharashtra-agriculture-agri-market/): किसानवाणी : राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये आज विविध कृषी मालांच्या बाजारभावात (Maharashtra Agriculture Agri Market) संमिश्र चित्र पाहायला मिळाले. सोयाबीनच्या दरात सुधारणा झाली असली, तरी लसणाच्या बाजारावर दबाव कायम राहिला. कापसाच्या दरात किंचित वाढ झाली, तर आल्याच्या बाजारात वेगवेगळ्या बाजार समित्यांमध्ये चढ-उतार दिसून आले. दुसरीकडे, डाळिंबाची आवक मोठ्या प्रमाणात वाढूनही बाजारभाव स्थिर राहिल्याचे दिसून आले. - [पावसाळ्यात गोठ्यात वाढणाऱ्या डास-गोमाशांवर नियंत्रण कसे ठेवावे?; दूध उत्पादन घटू नये यासाठी ‘हे’ उपाय करा | Cattle Shed Management](https://kisanwani.com/cattle-shed-management/): किसानवाणी : पावसाळा सुरू झाल्यानंतर वातावरणातील आर्द्रता वाढते, जागोजागी पाणी साचते आणि गोठ्यामध्येही ओलसरपणा (Cattle Shed Management) निर्माण होतो. ही परिस्थिती डास, माशा, गोमाशा आणि इतर लहान कीटकांच्या वाढीसाठी अत्यंत पोषक ठरते. या कीटकांचा प्रादुर्भाव वाढल्यास त्याचा थेट परिणाम जनावरांच्या आरोग्यावर होतो. इतकेच नव्हे, तर दुभत्या जनावरांच्या दूध उत्पादनातही मोठी घट होऊ शकते. त्यामुळे पावसाळ्यात गोठ्याची स्वच्छता, योग्य व्यवस्थापन आणि वेळेवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे. - [महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! ‘या’ 7 जिल्ह्यांतच हलक्या सरींची शक्यता| Maharashtra Rain News](https://kisanwani.com/maharashtra-rain-news/): किसानवाणी : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून मॉन्सूनचा जोर कमी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कोकण आणि घाटमाथ्यावर सुरू असलेला पावसाचा जोर आता ओसरला (Maharashtra Rain News) असून, मागील दोन दिवसांपासून राज्यातील बहुतांश भागात पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी ऊन आणि ढगाळ वातावरणाचा खेळ सुरू असून, काही भागात तापमानात वाढ झाल्याने नागरिकांसह शेतकऱ्यांनाही उकाड्याचा सामना करावा लागत आहे. - [आता शेतजमीन खरेदीसाठी शेतकरी असल्याचा पुरावा अनिवार्य; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय | Maharashtra Agricultural Land](https://kisanwani.com/maharashtra-agricultural-land/): किसानवाणी : महाराष्ट्रात कृषी जमीन खरेदीसंदर्भात राज्य सरकारने महत्त्वाची भूमिका (Maharashtra Agricultural Land) स्पष्ट केली आहे. राज्यात शेतकरी नसताना शेतजमीन खरेदी करण्याच्या वाढत्या प्रकारांना आळा घालण्यासाठी सरकार कठोर पावले उचलणार असल्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत स्पष्ट केले. कोणत्याही परराज्यातील किंवा बिगर शेतकरी व्यक्तीला महाराष्ट्रात शेतकरी असल्याचा वैध पुरावा सादर केल्याशिवाय कृषी जमीन खरेदी करता येणार नाही, असे त्यांनी सांगितले. - [पावसाळ्यात गोगलगायीचा वाढता प्रादुर्भाव; या सोप्या उपायांनी वाचवा पिके | Monsoon Farming Snail Control](https://kisanwani.com/monsoon-farming-snail-control/): किसानवाणी : राज्यात अनेक भागांत मान्सून सक्रिय झाला असून सततचा पाऊस, ढगाळ वातावरण आणि वाढलेली आर्द्रता यामुळे शंखी गोगलगायीचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. विशेषतः पश्चिम महाराष्ट्र (Monsoon Farming Snail Control) आणि मराठवाड्यातील काही भागांत सोयाबीन, कापूस, भाजीपाला तसेच इतर कोवळ्या पिकांमध्ये गोगलगायीमुळे नुकसान होत असल्याचे दिसून येत आहे. योग्य वेळी नियंत्रण न केल्यास या किडीमुळे रोपांची वाढ खुंटणे, पाने व फुले नष्ट होणे आणि उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता असते. त्यामुळे शेतकऱ्यांनी नियमित शेत पाहणी करून सुरुवातीच्या टप्प्यातच व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. - [Tribal Farmer Relief | वनपट्टाधारकांसाठी मोठा निर्णय! आता मिळणार फार्मर आयडी, पीक कर्ज आणि सरकारी योजनांचा लाभ](https://kisanwani.com/tribal-farmer-relief/): किसानवाणी : वनहक्क कायद्यांतर्गत वनपट्टे मिळालेल्या आदिवासी आणि इतर पारंपरिक वननिवासी कुटुंबांसाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. वनपट्टाधारकांसाठी विशेष बाब म्हणून स्वतंत्र गाव नमुना ७ ई आणि गाव नमुना १२ ई तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे राज्यातील दोन लाखांहून अधिक वनपट्टाधारक कुटुंबांना फार्मर आयडी, पीक कर्ज, कृषी विभागाच्या विविध योजना, ॲग्रीस्टॅक नोंदणी, नैसर्गिक आपत्तीतील मदत तसेच इतर शासकीय योजनांचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. - [आजचे बाजारभाव: काकडी-कोथिंबिरीला मोठी तेजी, ज्वारी-मक्यात चढ-उतार; आंब्याच्या आवकेत घट | Maharashtra Market Rates](https://kisanwani.com/maharashtra-market-rates/): किसानवाणी : राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये आज ज्वारी, मका, काकडी, कोथिंबीर आणि आंबा या प्रमुख कृषी मालांच्या आवक आणि बाजारभावात (Maharashtra Market Rates) संमिश्र स्थिती पाहायला मिळाली. काही बाजारांमध्ये आवक वाढूनही दर स्थिर राहिले, तर काही ठिकाणी आवक घटल्यामुळे दरात वाढ झाली. विशेषतः काकडी आणि कोथिंबीरला चांगली तेजी मिळाली, तर आंब्याच्या आवकेत लक्षणीय घट नोंदविण्यात आली. - [महाराष्ट्रात पावसाचा जोर ओसरणार; पुणे-सातारा घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट, ‘या’ जिल्ह्यांना येलो अलर्ट | Maharashtra Weather Monsoon Rain Forecast](https://kisanwani.com/maharashtra-weather-monsoon-rain-forecast/): किसानवाणी : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसाचा ( Maharashtra Weather Monsoon Rain Forecast) जोर आता हळूहळू कमी होण्याची चिन्हे दिसत आहेत. मात्र, राज्यातील काही भागांमध्ये अद्यापही जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता कायम असल्याने हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. विशेषतः पुणे आणि सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथा परिसरात आज (ता. ८) अति जोरदार पावसाची शक्यता असल्यामुळे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय पालघर, रायगड, रत्नागिरी तसेच कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथा भागात जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला असून, विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये विजांसह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. - [खरीपासाठी खतांचा पुरेसा साठा; युरिया-डीएपी उत्पादनातही मोठी वाढ, केंद्राचा दावा |Urea DAP Fertilizer Stock](https://kisanwani.com/urea-dap-fertilizer-stock/): किसानवाणी : खरीप हंगामात खतांचा तुटवडा निर्माण होऊ नये, यासाठी केंद्र सरकारने (Urea DAP Fertilizer Stock) खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचा दावा केला आहे. एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत खरीप हंगामासाठी देशाची एकूण खतांची गरज ३८३.९० लाख टन इतकी असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. त्यापैकी २ जुलैपर्यंत १६३.३५ लाख टन, म्हणजेच सुमारे ४३ टक्के खतांचा साठा उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच जुलै ते सप्टेंबर या काळात देशांतर्गत उत्पादनात वाढ होत असल्याने आणि आयातही नियोजनबद्ध पद्धतीने सुरू असल्यामुळे खरीप हंगामात खतांचा पुरवठा सुरळीत राहील, असा विश्वास केंद्र सरकारने व्यक्त केला आहे. - [दूध उत्पादनात नफा वाढवायचा? भेसळ रोखणे आणि खर्च कमी करणे का गरजेचे? | Dairy Farming Milk Production](https://kisanwani.com/dairy-farming-milk-production/): किसानवाणी : ग्रामीण अर्थव्यवस्थेत शेतीनंतर दुग्ध व्यवसाय हा शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचा सर्वात महत्त्वाचा आधार मानला जातो. महाराष्ट्रातील लाखो लहान आणि मध्यम शेतकरी दररोज दूध विक्रीतून (Dairy Farming Milk Production) आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मात्र, गेल्या काही वर्षांत पशुखाद्य, चारा, औषधे, वीज, मजुरी आणि वाहतूक खर्चात सातत्याने वाढ होत असताना दूध उत्पादकांना मिळणारा दर त्याच प्रमाणात वाढलेला दिसत नाही. या परिस्थितीमागे अनेक कारणे असली तरी दुधातील भेसळ हा अत्यंत गंभीर आणि दुर्लक्षित मुद्दा असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. - [करटोली लागवड ठरतेय फायदेशीर; जाणून घ्या संपूर्ण शेती तंत्रज्ञान | Kartoli Spine Gourd](https://kisanwani.com/kartoli-spine-gourd/): किसानवाणी : महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये नैसर्गिकरीत्या आढळणारी करटोली (Kartoli Spine Gourd) ही पारंपरिक रानभाजी आता व्यावसायिक शेतीकडे वाटचाल करत आहे. औषधी गुणधर्म, पौष्टिक मूल्य आणि बाजारातील वाढती मागणी यामुळे करटोलीच्या लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढू लागला आहे. विशेषतः कोकण, दक्षिण महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये करटोलीची नियोजनबद्ध पद्धतीने शेती केली जात असून, कमी खर्चात चांगले उत्पादन मिळत असल्यामुळे हे पीक शेतकऱ्यांसाठी फायदेशीर पर्याय ठरत आहे. - [शेतातील ओलावा टिकवण्यासाठी मृत आणि बंदिस्त सरींचा वापर; जाणून ‘घ्या’ संपूर्ण माहिती | Soil Moisture Conservation](https://kisanwani.com/soil-moisture-conservation/): किसानवाणी : राज्यात सध्या अनेक भागांमध्ये पावसाने हजेरी लावली असून काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस होत आहे. मात्र यंदा एल निनोच्या प्रभावामुळे सरासरीपेक्षा (Soil Moisture Conservation) कमी पावसाची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे सध्या पडणाऱ्या पावसानंतर दीर्घ खंड पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी उपलब्ध पावसाच्या प्रत्येक थेंबाचा योग्य वापर करून तो जास्तीत जास्त प्रमाणात जमिनीत मुरवणे आवश्यक ठरते. यासाठी मृत सरी, बंदिस्त सरी आणि उभ्या पिकात सरी काढणे या पद्धती अत्यंत उपयुक्त असल्याचे कृषी तज्ज्ञांनी सांगितले आहे. - [कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेसाठी २० जुलैपर्यंत विशेष मोहीम; २ कोटींच्या कर्जावर ३% व्याज सवलत | Agriculture Infrastructure Fund](https://kisanwani.com/agriculture-infrastructure-fund/): किसानवाणी : भारत सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या कृषी पायाभूत सुविधा निधी ( Agriculture Infrastructure Fund) योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी देशभरात २० जुलैपर्यंत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेच्या माध्यमातून अधिकाधिक पात्र शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्या (FPO), सहकारी संस्था, कृषी उद्योजक आणि इतर लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आत्माचे प्रकल्प संचालक अमोल आगवण यांनी केले आहे. - [सोयाबीन बाजार तेजीत; हरभरा, गहू, कोबी आणि लिंबूचे आजचे बाजारभाव | Agriculture News](https://kisanwani.com/agriculture-news/): किसानवाणी : राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये (Agriculture News) आज विविध शेतीमालाच्या दरांमध्ये मिश्र चित्र पाहायला मिळाले. सोयाबीन बाजारात तेजीचे वातावरण कायम राहिले असून प्रमुख बाजार समित्यांमध्ये सरासरी दरात वाढ नोंदविण्यात आली. दुसरीकडे हरभऱ्याच्या बाजारात आवक आणि दरात चढ-उतार दिसून आले. कोबीच्या बाजारात आवक कमी झाल्याने दरांना आधार मिळाला, तर गव्हाच्या बाजारात आवकेत वाढ झाली असली तरी काही बाजारांमध्ये दरात किरकोळ घसरण झाली. लिंबू बाजारातही आवक आणि दरांमध्ये बदल दिसून आला. - [Maharashtra Rain IMD Weather Update | महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा; पालघर, रायगड, नाशिक, पुणे घाटमाथ्यावर रेड अलर्ट](https://kisanwani.com/maharashtra-rain-imd-weather-update/): किसानवाणी : राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून कोकण आणि घाटमाथा भागात मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. भारतीय हवामान विभागाने (Maharashtra Rain IMD Weather Update) आज (ता. ७) पालघर, रायगड, नाशिक घाटमाथा आणि पुणे जिल्ह्याच्या घाटमाथा परिसरासाठी अति मुसळधार पावसाचा इशारा देत रेड अलर्ट जारी केला आहे. तर उर्वरित कोकण, पश्चिम घाट परिसर आणि विदर्भातील काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज आणि यलो अलर्ट देण्यात आला असून नागरिकांनी तसेच शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. - [Zoonotic Diseases | प्राण्यांपासून माणसांमध्ये पसरणाऱ्या आजारांचा वाढता धोका; ‘वन हेल्थ’ प्रणालीची गरज का वाढली?](https://kisanwani.com/zoonotic-diseases/): किसानवाणी : प्राण्यांपासून मानवामध्ये पसरणारे संसर्गजन्य आजार म्हणजेच प्राणिजन्य आजार (Zoonotic Diseases) ही सध्या जगासमोरील गंभीर सार्वजनिक आरोग्य समस्या बनली आहे. गेल्या काही वर्षांत उद्भवलेल्या अनेक नव्या संसर्गजन्य रोगांचे मूळ प्राण्यांमध्ये असल्याचे संशोधनातून स्पष्ट झाले आहे. बदलते हवामान, वाढते शहरीकरण, जंगलातील मानवी हस्तक्षेप, आंतरराष्ट्रीय प्रवास, प्राणिजन्य उत्पादनांचा वाढता व्यापार तसेच भटक्या जनावरांची वाढती संख्या यामुळे अशा आजारांचा धोका सातत्याने वाढत आहे. त्यामुळे प्राणिजन्य आजारांबाबत जागरूकता वाढविणे आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणे ही काळाची गरज बनली आहे. - [कपाशीतील तणांचा कायमचा बंदोबस्त! उगवणपूर्व आणि उगवणपश्चात कोणते तणनाशक फवारावे? | Cotton Farming Pre Emergence Herbicide](https://kisanwani.com/cotton-farming-pre-emergence-herbicide/): किसानवाणी : राज्यात बहुतांश भागात मान्सूनने जोरदार हजेरी लावल्यामुळे खरीप हंगामातील पेरण्यांना चांगला वेग आला आहे. अनेक भागांमध्ये कपाशीची लागवड (Cotton Farming Pre Emergence Herbicide) पूर्ण झाली असून काही ठिकाणी अद्याप लागवड सुरू आहे. पावसामुळे पिकांच्या वाढीस पोषक वातावरण निर्माण झाले असले, तरी त्याचबरोबर तणांचाही मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढते. तणांमुळे पिकांशी अन्नद्रव्ये, पाणी आणि सूर्यप्रकाशासाठी स्पर्धा निर्माण होत असल्याने कपाशीच्या उत्पादनावर त्याचा थेट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे लागवडीच्या सुरुवातीपासूनच तणांचे प्रभावी नियंत्रण करणे अत्यंत आवश्यक आहे. - [Monsoon Livestock Care | पावसाळ्यात जनावरांना वैरण देताना काय काळजी घ्यावी? प्रत्येक पशुपालकाने जाणून घ्याव्यात या महत्त्वाच्या गोष्टी…](https://kisanwani.com/monsoon-livestock-care/): किसानवाणी : पावसाळा सुरू होताच जनावरांसाठी हिरव्या चाऱ्याची (Monsoon Livestock Care) मुबलक उपलब्धता होते. नव्याने उगवलेला कोवळा हिरवा चारा पोषक घटकांनी समृद्ध असल्यामुळे जनावरे तो अतिशय आवडीने खातात. मात्र हा चारा जितका पौष्टिक आहे, तितकीच तो योग्य पद्धतीने खाऊ घालण्याची गरजही आहे. कारण हिरवा चारा जास्त प्रमाणात किंवा चुकीच्या पद्धतीने दिल्यास जनावरांमध्ये पोटफुगी, अपचन आणि पचनसंस्थेशी संबंधित विविध समस्या निर्माण होऊ शकतात. काही गंभीर प्रकरणांमध्ये पोटफुगीमुळे जनावराच्या हृदय आणि फुफ्फुसांवर अतिरिक्त ताण येऊन जीवितहानी होण्याचाही धोका असतो. त्यामुळे पावसाळ्यात जनावरांना वैरण देताना पशुपालकांनी काही महत्त्वाच्या बाबींची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. - [Maharashtra Rain Update Ghat Region | कोकण-घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा रेड अलर्ट; विदर्भात ऑरेंज अलर्ट, IMD चा मोठा इशारा](https://kisanwani.com/maharashtra-rain-update-ghat-region/): किसानवाणी : राज्यात मागील दोन दिवसांपासून पावसाचा जोर कायम (Maharashtra Rain Update Ghat Region) असून विशेषतः कोकण आणि घाटमाथा परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळत आहेत. मात्र मराठवाड्यात अद्यापही जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम असल्याचे चित्र आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील पाच दिवसांसाठी राज्याचा सविस्तर हवामान अंदाज जाहीर केला असून, कोकण, घाटमाथा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांसाठी विविध स्तरांचे इशारे देण्यात आले आहेत. - [Sustainable Farming | एल-निनोच्या संकटात शेतकऱ्यांसाठी दिलासादायक उपाय; मूलस्थानी जलसंधारणातून शाश्वत शेती शक्य](https://kisanwani.com/sustainable-farming/): किसानवाणी : यंदाच्या खरीप हंगामावर एल-निनो हवामान प्रणालीचे सावट असल्याने राज्यातील अनेक भागांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याची तसेच दोन पावसांमधील खंड वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशा परिस्थितीत केवळ पावसाच्या प्रमाणावर अवलंबून न राहता जमिनीतील ओलावा जास्तीत जास्त काळ टिकवून ठेवणाऱ्या शेती पद्धतींचा अवलंब करणे आवश्यक ठरणार आहे. कृषी तज्ज्ञांच्या मते, योग्य पिकांची निवड, हवामानाशी सुसंगत वाणांचा वापर, मूलस्थानी जलसंधारण, आंतरपीक पद्धती आणि रुंद वरंबा-सरी (Sustainable Farming) तंत्रज्ञानाचा वापर केल्यास कमी पावसातही उत्पादन टिकवून ठेवणे शक्य होऊ शकते. - [शेतीमाल प्रक्रियेतील नवी क्रांती! मिनिमल प्रोसेसिंगमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्याची मोठी संधी | Post Harvest Management](https://kisanwani.com/post-harvest-management/): किसानवाणी : कृषी क्षेत्रात उत्पादन वाढविण्याइतकेच उत्पादनाला योग्य बाजारपेठ (Post Harvest Management) आणि योग्य दर मिळणेही महत्त्वाचे ठरत आहे. मात्र, निसर्गाचा लहरीपणा, उत्पादनातील वाढ आणि बाजारातील मागणी-पुरवठ्याचा ताळमेळ न बसल्यामुळे अनेकदा शेतकऱ्यांना आपल्या शेतीमालाला योग्य भाव मिळत नाही. परिणामी, मेहनतीने पिकवलेला भाजीपाला आणि फळे अत्यल्प दराने विकावी लागतात किंवा काही वेळा बाजारभाव नसल्याने ती टाकून देण्याची वेळ येते. या समस्येवर उपाय म्हणून आता शेतीमाल प्रक्रियेतील 'मिनिमल प्रोसेसिंग' (Minimal Processing) ही संकल्पना वेगाने पुढे येत असून, ती शेतकऱ्यांसाठी मूल्यवर्धनाची नवी संधी ठरत आहे. - [El Niño Impact | एल निनोमुळे पिकांमध्ये वाढतोय जैवरासायनिक ताण; उत्पादनावर होणार मोठा परिणाम](https://kisanwani.com/el-nino-impact/): किसानवाणी : सध्या जागतिक स्तरावर ‘एल निनो’चा (El Niño Impact) प्रभाव वाढत असून त्याचे पडसाद भारतासह महाराष्ट्रातील हवामानावरही उमटू लागले आहेत. हवामानातील या बदलामुळे मॉन्सूनच्या पावसात अनिश्चितता निर्माण होण्याची शक्यता वाढली असून त्याचा थेट परिणाम शेती आणि पिकांच्या उत्पादनक्षमतेवर होऊ शकतो. महाराष्ट्रातील बहुतांश शेती ही पावसावर अवलंबून असल्याने एल निनोमुळे निर्माण होणारी दुष्काळसदृश परिस्थिती शेतकऱ्यांसाठी मोठे आव्हान ठरू शकते. जलताणामुळे पिकांमध्ये अनेक महत्त्वाचे जैवरासायनिक बदल घडतात आणि त्याचा परिणाम वाढ, विकास तसेच अंतिम उत्पादनावर होतो. त्यामुळे एल निनोच्या पार्श्वभूमीवर पिकांमध्ये होणारे बदल समजून घेऊन योग्य व्यवस्थापन करणे अत्यंत आवश्यक ठरते. - [शेतकऱ्यांसाठी मोठी संधी! भारत-जपान उभारणार 1,000 बायोगॅस प्रकल्प; शेण व कृषी कचऱ्यापासून होणार उत्पन्न | India Japan CBG Initiative](https://kisanwani.com/india-japan-cbg-initiative/): किसानवाणी : भारत आणि जपान यांनी स्वच्छ ऊर्जा, ग्रामीण विकास आणि शाश्वत कृषी व्यवस्थेला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलत ‘भारत-जपान कॉम्प्रेस्ड बायोगॅस (India Japan CBG Initiative) उपक्रमा’ची घोषणा केली आहे. जपानच्या पंतप्रधान सानाए ताकाइची यांनी गुरुवारी ‘भारत-जपान संयुक्त आर्थिक मंचा’ला संबोधित करताना या महत्त्वाकांक्षी उपक्रमाची माहिती दिली. या उपक्रमाअंतर्गत भारतातील शेण, भाताचा पेंढा, उसाचे अवशेष आणि इतर कृषी कचऱ्याचा उपयोग करून मोठ्या प्रमाणावर कॉम्प्रेस्ड बायोगॅस (CBG) निर्मिती केली जाणार आहे. या माध्यमातून ग्रामीण भागातील उपलब्ध नैसर्गिक संसाधनांचा प्रभावी वापर करून स्वच्छ ऊर्जा उत्पादनाला गती देण्याचा उद्देश आहे. - [Agriculture Education | कृषी क्षेत्रात करिअरच्या मोठ्या संधी; दहावीनंतर ते पीएचडीपर्यंत संपूर्ण मार्गदर्शन](https://kisanwani.com/agriculture-education/): किसानवाणी : भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कृषी क्षेत्रामध्ये (Agriculture Education) गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर तांत्रिक आणि संरचनात्मक बदल होत आहेत. देशातील सुमारे ५५ टक्के लोकसंख्या आजही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे शेती आणि कृषीपूरक व्यवसायांवर अवलंबून आहे. वाढती लोकसंख्या, हवामानातील बदल, अन्नधान्याची वाढती मागणी आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वाढता वापर यामुळे कृषी क्षेत्र अधिक विज्ञानाधिष्ठित आणि कौशल्याधारित बनत आहे. त्यामुळे कृषी शिक्षण हे केवळ शेतीपुरते मर्यादित न राहता रोजगार, संशोधन, उद्योजकता आणि तंत्रज्ञान विकासासाठी महत्त्वाचे करिअर क्षेत्र म्हणून उदयास आले आहे. - [China Consumer Market | चीनमध्ये ‘प्रायव्हेट लेबल’ किराणा ब्रँड्सची जोरदार वाढ; मोठ्या कंपन्यांसमोर नवे आव्हान](https://kisanwani.com/china-consumer-market/): किसानवाणी : चीनमधील किराणा क्षेत्रात ‘प्रायव्हेट लेबल’ अर्थात स्वतःच्या ब्रँडने विकल्या जाणाऱ्या उत्पादनांचा बाजार झपाट्याने विस्तारत असून, यामुळे पारंपरिक मोठ्या ब्रँड्ससमोर नवे आव्हान निर्माण झाले आहे. ग्राहकांच्या बदलत्या खरेदीच्या सवयी, परवडणाऱ्या किमतीत दर्जेदार उत्पादने मिळण्याची वाढती अपेक्षा आणि ई-कॉमर्स तसेच आधुनिक सुपरमार्केट साखळ्यांचा वाढता प्रभाव यामुळे चीनमध्ये या बाजाराचा वेगाने विकास होत आहे. अमेरिकेच्या कृषी विभागाच्या (USDA) परदेशी कृषी सेवा (Foreign Agricultural Service) अहवालानुसार, २०२५ मध्ये चीनमधील प्रायव्हेट लेबल किराणा उत्पादनांच्या बाजाराचे मूल्य सुमारे ५५ अब्ज अमेरिकी डॉलरपर्यंत पोहोचले असून, या क्षेत्राचा वार्षिक वाढीचा दर तब्बल १७ टक्के नोंदविण्यात आला आहे. - [राज्यात पावसाचा जोर वाढणार; 7 जिल्ह्यांना रेड अलर्ट, अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा | Maharashtra Rain IMD Forecast 2026](https://kisanwani.com/maharashtra-rain-imd-forecast-2026/): किसानवाणी : राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची चिन्हे दिसत असून, हवामान विभागाने (Maharashtra Rain IMD Forecast 2026) कोकण आणि घाटमाथा परिसरासाठी अतिजोरदार पावसाचा इशारा जारी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून कोकण, घाटमाथा आणि राज्यातील विविध भागांमध्ये पावसाची तीव्रता वाढली असून अनेक ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली आहे. आज (४ जुलै) विशेषतः पालघर, मुंबई, ठाणे, रायगड, नाशिक घाटमाथा, पुणे घाटमाथा आणि सातारा घाटमाथा या भागांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. - [शेळीपालन सुरू करायचंय? सरकार देत आहे ५०% ते ७५% अनुदान, जाणून ‘घ्या’ विविध योजनांची सविस्तर माहिती | Goat Farming Scheme](https://kisanwani.com/goat-farming-scheme/): किसानवाणी : महाराष्ट्रात शेतीला जोडधंदा म्हणून शेळीपालन व्यवसायाचा स्वीकार करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. कमी भांडवलात सुरू करता येणारा आणि नियमित उत्पन्न देणारा व्यवसाय म्हणून शेळीपालनाकडे (Goat Farming Scheme) पाहिले जाते. त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकारकडूनही शेळीपालनाला प्रोत्साहन देण्यासाठी विविध अनुदान योजना राबवल्या जात आहेत. या योजनांच्या माध्यमातून शेळ्या खरेदी करण्यापासून ते शेड उभारणी, प्रशिक्षण आणि बँक कर्जापर्यंत विविध प्रकारची मदत उपलब्ध करून दिली जाते. - [Maharashtra Konkan Weather Rain Alert | पुढील 5 दिवस मुसळधार पावसाचा इशारा; अनेक जिल्ह्यांना रेड, ऑरेंज आणि यलो अलर्ट](https://kisanwani.com/maharashtra-konkan-weather-rain-alert/): किसानवाणी : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढला असून विविध भागांत जोरदार ते मुसळधार पावसाच्या सरी कोसळत आहेत. या पार्श्वभूमीवर भारतीय हवामानशास्त्र विभागाने (Maharashtra Konkan Weather Rain Alert) पुढील पाच दिवसांसाठी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांसाठी पावसाचा सविस्तर अंदाज जाहीर केला आहे. त्यानुसार कोकण, विदर्भ आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असून काही जिल्ह्यांसाठी रेड, ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. - [शेतकऱ्यांना मोठा दिलासा! शेतीकामासाठी माती, मुरूम, गाळ मोफत; रॉयल्टी पूर्णपणे माफ | Maharashtra Farmers Minor Minerals](https://kisanwani.com/maharashtra-farmers-minor-minerals/): किसानवाणी : ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेती विकासकामांसाठी मोठा दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने जाहीर केला आहे. शेतकऱ्यांना स्वतःच्या शेतीच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या (Maharashtra Farmers Minor Minerals) माती, मुरूम आणि गाळासारख्या गौण खनिजांवर रॉयल्टीमुक्ती देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, स्वतःच्या वापरासाठी या साहित्याची वाहतूक करणाऱ्या शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर, ट्रक किंवा बैलगाड्यांवर कोणतीही दंडात्मक कारवाई केली जाणार नाही, अशी घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी (ता. २) राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत केली. - [१५ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात १६२४ कोटी जमा; नांदेडला सर्वाधिक भरपाई | PMFBY Pradhan Mantri Fasal Bima Yojana](https://kisanwani.com/pmfby-pradhan-mantri-fasal-bima-yojana/): किसानवाणी : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत (PMFBY Pradhan Mantri Fasal Bima Yojana) खरीप २०२५ हंगामात झालेल्या पिकांच्या नुकसानीपोटी राज्यातील १५ लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आतापर्यंत १६२४ कोटी रुपयांची भरपाई जमा करण्यात आली आहे. गेल्या खरीप हंगामात अतिवृष्टी, अवकाळी पाऊस तसेच इतर नैसर्गिक कारणांमुळे अनेक भागांतील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे नुकसानभरपाईची शेतकरी आतुरतेने वाट पाहत होते. आता या भरपाईचे वितरण मोठ्या प्रमाणावर पूर्ण झाले असून, सर्वाधिक भरपाई नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळाल्याची माहिती समोर आली आहे. - [BBF Farming | कमी पाऊस असो की अतिवृष्टी, बीबीएफ लागवड पद्धत शेतकऱ्यांसाठी ठरते वरदान](https://kisanwani.com/bbf-farming/): किसानवाणी : हवामानातील सातत्याने होत असलेल्या बदलांमुळे शेतीपुढील आव्हाने दिवसेंदिवस वाढत आहेत. कधी अत्यल्प पाऊस, कधी अल्प कालावधीत होणारा मुसळधार पाऊस, तर कधी अतिवृष्टी अशा अनिश्चित परिस्थितीचा थेट परिणाम खरीप हंगामातील पिकांच्या वाढीवर आणि उत्पादनावर होत आहे. विशेषतः मध्यम ते भारी जमिनीमध्ये पावसाचे पाणी साचल्यामुळे पिकांची मुळे कुजण्याचा धोका वाढतो, तर कमी पावसाच्या परिस्थितीत जमिनीत आवश्यक ओलावा टिकत नसल्याने पिकांची वाढ खुंटते. अशा बदलत्या हवामानात पावसाच्या प्रत्येक थेंबाचा योग्य वापर करणे आणि अतिरिक्त पाण्याचा प्रभावी निचरा करणे अत्यंत आवश्यक झाले आहे. यासाठी रुंद वरंबा-सरी (BBF Farming) लागवड पद्धत अत्यंत प्रभावी पर्याय म्हणून समोर आली आहे. - [गोदाम नोंदणीचे नवीन निकष; WDRA चे नियम, शुल्क, विमा आणि आवश्यक सुविधांची ‘संपूर्ण’ माहिती | Warehouse Development and Regulatory Authority](https://kisanwani.com/warehouse-development-and-regulatory-authority/): किसानवाणी : देशात शास्त्रीय पद्धतीने गोदाम व्यवस्था विकसित (Warehouse Development and Regulatory Authority) करून शेतकऱ्यांना अधिक चांगल्या बाजारव्यवस्थेशी जोडणे, कृषी मालाच्या साठवणुकीला चालना देणे तसेच ग्रामीण भागात कर्जाची उपलब्धता वाढविणे या उद्देशाने केंद्र शासनाने विविध धोरणे राबविली आहेत. शेतकरी ते ग्राहक ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी अनेक योजना व प्रकल्प सुरू करण्यात आले असले, तरी कृषी मूल्य साखळीतील मध्यस्थांची संख्या कमी करण्यात अपेक्षित यश अद्याप मिळालेले नाही. याच पार्श्वभूमीवर समुदाय आधारित संस्थांना कृषी मूल्य साखळ्यांमध्ये प्रवेश मिळावा यासाठी विविध योजना व प्रकल्पांची अंमलबजावणी सुरू आहे. - [Lek Ladki Yojana 2026 | मुलींना मिळणार ₹1.01 लाख; पात्रता, अर्ज प्रक्रिया जाणून ‘घ्या’ सविस्तर माहिती](https://kisanwani.com/lek-ladki-yojana-2026/): किसानवाणी : महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत राज्यातील मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देणे, त्यांच्या शिक्षणाला आर्थिक आधार मिळवून देणे आणि बालविवाहास आळा घालणे या उद्देशाने राबविण्यात येणारी लेक लाडकी योजना (Lek Ladki Yojana 2026) ही राज्यातील महत्त्वाच्या योजनांपैकी एक आहे. या योजनेअंतर्गत पात्र मुलींना जन्मापासून ते १८ वर्षे पूर्ण होईपर्यंत विविध टप्प्यांमध्ये एकूण ₹1,01,000 इतकी आर्थिक मदत दिली जाते. ही मदत शासनाकडून अनुदान स्वरूपात दिली जात असल्याने लाभार्थ्यांना ती परत करण्याची आवश्यकता नसते. - [महिला शेतकरी विधेयक 2026; महिला शेतकरी प्रमाणपत्र, पात्रता, फायदे जाणून ‘घ्या’ सविस्तर माहिती | Women Farmers Bill](https://kisanwani.com/women-farmers-bill/): किसानवाणी : महाराष्ट्रातील शेती क्षेत्रात महिलांच्या योगदानाला प्रथमच स्वतंत्र कायदेशीर मान्यता देणारे महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक, २०२६ (Women Farmers Bill) विधानसभेत संमत झाले आहे. या विधेयकामुळे केवळ जमिनीच्या मालकीवर नव्हे, तर प्रत्यक्ष शेतीत आणि शेतीपूरक व्यवसायात काम करणाऱ्या महिलांना शेतकरी म्हणून अधिकृत ओळख मिळणार आहे. त्यामुळे राज्यातील लाखो भूमिहीन महिला तसेच कुटुंबाच्या नावावरील जमिनीवर वर्षानुवर्षे शेती करणाऱ्या महिलांना स्वतंत्र शेतकरी म्हणून मान्यता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. - [ICRISAT Groundnut Varieties | भुईमुगाचे दोन नवीन वाण विकसित; ८१% ओलिक अॅसिड, ५३% तेलाचा मोठा फायदा](https://kisanwani.com/icrisat-groundnut-varieties/): किसानवाणी : देशातील खाद्यतेल उत्पादनात वाढ करण्याबरोबरच भुईमूग उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने इंटरनॅशनल क्रॉप्स रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर द सेमी-अॅरिड ट्रॉपिक्स (ICRISAT Groundnut Varieties) ने भुईमुगाचे दोन नवीन उच्च ओलिक (High Oleic) वाण विकसित केले आहेत. या दोन्ही वाणांना भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR) अंतर्गत कार्यरत असलेल्या अखिल भारतीय समन्वित भुईमूग संशोधन प्रकल्पाने (AICRP-Groundnut) राष्ट्रीय स्तरावरील मंजुरीसाठी शिफारस केली आहे. त्यामुळे भविष्यात या वाणांचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर लाभ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. - [Polyhouses Farming Techniques | पॉलिहाउसचे किती प्रकार आहेत? कोणत्या पिकासाठी कोणते मॉडेल योग्य?](https://kisanwani.com/polyhouses-farming-techniques/): किसानवाणी : बदलते हवामान, अनियमित पाऊस, वाढते तापमान, कीड-रोगांचा वाढता प्रादुर्भाव आणि नैसर्गिक आपत्ती यांसारख्या आव्हानांमुळे पारंपरिक शेतीपुढे मोठे संकट उभे राहिले आहे. अशा परिस्थितीत कमी क्षेत्रातून अधिक, दर्जेदार आणि वर्षभर उत्पादन मिळवून देणारे संरक्षित शेती तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी प्रभावी पर्याय ठरत आहे. संरक्षित शेतीमधील सर्वाधिक लोकप्रिय आणि परिणामकारक तंत्रज्ञान म्हणजे पॉलिहाउस (Polyhouses Farming Techniques). पारदर्शक आणि अतिनील (UV) किरण-प्रतिरोधक पॉलीथिन फिल्म किंवा इतर आच्छादन साहित्यापासून तयार केलेल्या या संरचनेमध्ये तापमान, आर्द्रता, प्रकाश, वायुविजन आणि सिंचन यांचे आवश्यकतेनुसार नियंत्रण करता येते. त्यामुळे बाह्य वातावरणातील प्रतिकूल परिणाम कमी होऊन पिकांच्या वाढीस अनुकूल वातावरण उपलब्ध होते. परिणामी उत्पादनात वाढ, गुणवत्तेमध्ये सुधारणा, पाण्याची बचत आणि अधिक आर्थिक परतावा मिळण्यास मदत होते. - [द्राक्ष उत्पादक सावधान! पावसानंतर ‘या’ रोगांचा वाढणार धोका; तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा इशारा | Maharashtra Agriculture Monsoon](https://kisanwani.com/maharashtra-agriculture-monsoon/): किसानवाणी : महाराष्ट्रात मॉन्सूनचे आगमन झाले असले तरी सध्या मुसळधार पावसाचा (Maharashtra Agriculture Monsoon) प्रभाव मुख्यतः कोकण किनारपट्टीपुरताच मर्यादित आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि द्राक्ष उत्पादक पट्ट्यात अजूनही सर्वदूर दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. हवामानातील बदलांचा विचार करता ‘एल निनो’चा प्रभाव वाढत असून त्याचा परिणाम मॉन्सूनवर दिसून येत आहे. दुसरीकडे आयओडी (Indian Ocean Dipole) अद्याप तटस्थ स्थितीत आहे. हवामान अभ्यासकांच्या अंदाजानुसार जुलै महिन्यात मध्य भारतात सरासरीपेक्षा सुमारे १०३ टक्के पाऊस होण्याची शक्यता असून त्यातील मोठा वाटा १५ जुलैपूर्वी पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. - [Rajmata Jijau Yojna 2026 | महिला बचत गटांसाठी मोठी संधी! ₹1 मध्ये मिळणार सरकारी जमीन](https://kisanwani.com/rajmata-jijau-yojna-2026/): किसानवाणी : ग्रामीण भागातील महिला बचत गटांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि त्याचवेळी राज्यातील शासकीय पडीक जमिनींचा उत्पादक वापर करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने 'राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजना 2026' (Rajmata Jijau Yojna 2026) लागू केली आहे. 19 जून 2026 रोजी जाहीर करण्यात आलेल्या या महत्त्वपूर्ण निर्णयानुसार महिला बचत गट, ग्रामसंघ आणि महिला सहकारी संस्थांना शासकीय पडीक जमीन केवळ ₹1 नाममात्र वार्षिक भाड्याने उपलब्ध करून दिली जाणार आहे. या जमिनीवर चारा, बांबू, नर्सरी तसेच अपारंपरिक ऊर्जा स्रोतांसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची लागवड करता येणार असून त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा संपूर्ण लाभ संबंधित संस्थेलाच मिळणार आहे. - [३० जूनची डेडलाइन हुकली! कर्जमाफी रखडल्याने पीककर्जाचा खोळंबा | Farm Loan Waiver Agriculture Loan Update](https://kisanwani.com/farm-loan-waiver-agriculture-loan-update/): किसानवाणी : राज्यातील शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात आलेल्या कर्जमाफीची अंमलबजावणी (Farm Loan Waiver Agriculture Loan Update) अद्याप स्पष्ट न झाल्याने खरीप हंगामाच्या तोंडावर मोठी अडचण निर्माण झाली आहे. सरकारने ३० जूनपूर्वी कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र मुदत उलटूनही अनेक शेतकऱ्यांची कर्जखाती 'नील' न झाल्याने त्यांना नवीन पीककर्ज मिळू शकलेले नाही. परिणामी राज्यातील अनेक भागांत पीककर्ज वाटपाचे प्रमाण केवळ १५ ते २० टक्क्यांपर्यंत मर्यादित राहिल्याची माहिती बँक अधिकाऱ्यांनी दिली आहे. - [Maharashtra Women Farmers Empowerment Bill 2026 | महिला शेतकऱ्यांना मिळणार कायदेशीर मान्यता; कर्ज, पीकविमा आणि सरकारी योजनांचा लाभ मिळणार](https://kisanwani.com/maharashtra-women-farmers-empowerment-bill-2026/): किसानवाणी : राज्यात शेती आणि शेतीपूरक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर काम करणाऱ्या महिलांना स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर मान्यता मिळवून देण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बुधवारी (ता. १) विधानसभेत 'महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक २०२६' मांडले. या विधेयकामुळे प्रत्यक्ष शेतीची जमीन किंवा मालकी नसतानाही शेती आणि संबंधित व्यवसायांमध्ये सक्रियपणे काम करणाऱ्या महिलांना शेतकरी म्हणून ओळख मिळणार असून, त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्याचा अधिकार मिळणार आहे. - [राज्यात १,११९ कृषी निविष्ठा विक्रेत्यांचे परवाने निलंबित; निकृष्ट बियाणे-खते विक्रेत्यांवर मोठी कारवाई | Maharashtra Agriculture Department](https://kisanwani.com/maharashtra-agriculture-department/): किसानवाणी : राज्यात निकृष्ट बियाणे, खते आणि कीटकनाशके विकून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या विक्रेत्यांविरोधात कृषी विभागाने (Maharashtra Agriculture Department) व्यापक कारवाई सुरू ठेवली असून, गेल्या तीन महिन्यांत राज्यभरात १,११९ परवाने निलंबित करण्यात आले आहेत. यामध्ये पुणे जिल्ह्यातील २७ कृषी निविष्ठा विक्रेत्यांवरही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. राज्यातील शेतकऱ्यांना दर्जेदार कृषी निविष्ठा उपलब्ध व्हाव्यात आणि बनावट अथवा निकृष्ट साहित्याच्या विक्रीवर प्रभावी नियंत्रण मिळवता यावे, यासाठी कृषी विभागाने विशेष तपासणी मोहीम अधिक तीव्र केली आहे. - [Farm Loan Waiver Maharashtra| कर्जमाफीच्या प्रक्रियेला विलंब; तोपर्यंत व्याज आकारू नका, बँकांना आदेश](https://kisanwani.com/farm-loan-waiver-maharashtra/): राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, २०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना प्रत्यक्ष कर्जमाफीचा (Farm Loan Waiver Maharashtra) लाभ मिळेपर्यंत त्यांच्या पात्र थकीत पीक कर्जावर कोणतेही अतिरिक्त व्याज आकारू नये, असे स्पष्ट निर्देश राज्य सरकारने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि विविध कार्यकारी सहकारी संस्थांना दिले आहेत. यासंदर्भातील शासन आदेश सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागामार्फत जारी करण्यात आला आहे. - [Seed Germination | कमी पावसातही बियाण्याची 100% उगवण हवी? मग या 5 गोष्टी ‘नक्की’ पाळा…](https://kisanwani.com/seed-germination/): किसानवाणी : यावर्षी एल निनोच्या प्रभावामुळे देशातील अनेक भागांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्याचबरोबर पावसाचे वितरणही अनियमित राहण्याचा अंदाज असल्याने खरीप हंगामातील शेतीचे नियोजन अधिक काळजीपूर्वक करणे आवश्यक ठरणार आहे. अशा परिस्थितीत पीक उत्पादनावर परिणाम होऊ नये, यासाठी पेरणीपासूनच योग्य व्यवस्थापन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे दर्जेदार बियाण्याची निवड आणि त्याची समाधानकारक उगवण. कारण बियाण्याची उगवण चांगली झाली तर शेतात अपेक्षित रोपसंख्या मिळते, पीक एकसारखे वाढते आणि पुढील सर्व पीक व्यवस्थापन (Seed Germination)अधिक सुलभ होते. - [सुपर एल निनोचा धोका वाढला; भारताच्या मॉन्सूनसह शेतीवर संकटाची शक्यता | Super El Nino Australia Bureau of Meteorology](https://kisanwani.com/super-el-nino-australia-bureau-of-meteorology/): किसानवाणी : जगभरातील हवामान व्यवस्थेला मोठा धक्का देऊ शकणारा 'सुपर एल निनो' ( Super El Nino Australia Bureau of Meteorology) वेगाने आकार घेत असल्याचा इशारा ऑस्ट्रेलियाच्या हवामान विभागाने दिला आहे. प्रशांत महासागरातील समुद्रपृष्ठाचे तापमान एल निनोसाठी आवश्यक असलेल्या मर्यादेपेक्षा झपाट्याने वाढत असून, महासागर आणि वातावरण यांच्यातील परस्परसंवाद अधिक मजबूत होत असल्याचे विभागाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, ही प्रक्रिया याच वेगाने सुरू राहिली तर १९५० नंतरच्या सर्वांत शक्तिशाली एल निनो घटनांपैकी एक यंदा अनुभवायला मिळू शकतो. त्यामुळे भारतासह जगभरात दुष्काळ, अतिवृष्टी, पूर, उष्णतेच्या लाटा आणि शेती उत्पादनावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. - [महाराष्ट्रात मॉन्सूनचा जोर वाढला; पालघर, पुणे घाटमाथ्यावर रेड अलर्ट, अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा | Monsoon Update Maharashtra Weather](https://kisanwani.com/monsoon-update-maharashtra-weather/): किसानवाणी : राज्यात नैऋत्य मोसमी वारे अधिक सक्रिय झाल्यामुळे पावसाचा जोर वाढू लागला आहे. विशेषतः कोकण किनारपट्टी, सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरील भाग तसेच विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पुढील २४ तासांत जोरदार (Monsoon Update Maharashtra Weather) ते अतिजोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर पालघर आणि पुणे जिल्ह्यातील घाटमाथा परिसरासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला असून नागरिकांनी तसेच प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. - [Maharashtra Rain Alert Konkan | कोकण-घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस; अकोल्यात अतिवृष्टी, खानदेशात भात लागवडीची चिंता](https://kisanwani.com/maharashtra-rain-alert-konkan/): किसानवाणी : राज्यात मान्सूनची चांगली प्रगती सुरू असली तरी पावसाचे वितरण (Maharashtra Rain Alert Konkan) अद्यापही असमान असल्याचे चित्र दिसून येत आहे. मंगळवारी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत राज्यातील बहुतांश भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. कोकण, घाटमाथा तसेच सातारा-कोयना परिसरात मात्र मध्यम ते जोरदार पावसाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्रात पावसाने खरीप पिकांना आधार दिला असून मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागांतही समाधानकारक सरी बरसल्या आहेत. मात्र खानदेशातील नाशिक जिल्ह्याच्या डोंगराळ आणि भात उत्पादक पट्ट्यात अद्यापही सरासरीपेक्षा अत्यल्प पाऊस झाल्याने भात रोपवाटिका आणि लागवडीबाबतची चिंता कायम आहे. - [कपाशी उत्पादकांसाठी महत्त्वाचे मार्गदर्शन; या 5 सूत्रांमुळे वाढेल उत्पादन आणि गुणवत्ता | Cotton Cultivation Cotton Crop](https://kisanwani.com/cotton-cultivation-cotton-crop/): किसानवाणी : कपाशी हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे नगदी पीक असून बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर त्याची लागवड अधिक शास्त्रशुद्ध पद्धतीने करणे काळाची गरज बनली आहे. नैसर्गिक संसाधनांचा कार्यक्षम वापर करून शाश्वत आणि अधिक फायदेशीर कपाशी उत्पादन घेण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने कपाशी लागवडीची पंचसूत्री अंगीकारणे आवश्यक असल्याचे कृषी तज्ज्ञांनी सांगितले आहे. योग्य जमीन निवडण्यापासून ते स्वच्छ कापूस उत्पादनापर्यंत प्रत्येक टप्प्यावर योग्य नियोजन, वेळेवर निर्णय आणि वैज्ञानिक व्यवस्थापन केल्यास उत्पादन, गुणवत्ता आणि नफा या तिन्ही बाबींमध्ये लक्षणीय वाढ साध्य करता येऊ शकते. - [मत्स्यपालनात करिअरची मोठी संधी; B.F.Sc. पदवीने मिळतील सरकारी नोकरीपासून स्वतःच्या व्यवसायापर्यंत अनेक पर्याय | Aquaculture Fish Farming BFSc](https://kisanwani.com/aquaculture-fish-farming-bfsc/): किसानवाणी : देशातील मत्स्य संवर्धन क्षेत्रात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर बदल होत असून हे क्षेत्र आता केवळ पारंपरिक मासेमारीपुरते मर्यादित राहिलेले नाही. आधुनिक तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान, वैज्ञानिक व्यवस्थापन आणि मूल्यवर्धित उत्पादनांवर आधारित उद्योग म्हणून मत्स्य व्यवसाय वेगाने विकसित होत आहे. केंद्र सरकारच्या ( Aquaculture Fish Farming BFSc) विविध योजनांमुळे या क्षेत्राला मोठी चालना मिळाली असून विशेषतः प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना (PMMSY) अंतर्गत मत्स्य उत्पादन वाढविणे, पायाभूत सुविधा विकसित करणे आणि मत्स्यपालन व्यवसायाला प्रोत्साहन देण्यावर भर दिला जात आहे. परिणामी, प्रशिक्षित आणि तांत्रिक ज्ञान असलेल्या मत्स्य विज्ञान पदवीधारकांची मागणी सातत्याने वाढत आहे. - [महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर; कोकण, विदर्भात ऑरेंज अलर्ट, पुढील 5 दिवस महत्त्वाचे | Maharashtra Weather Orange Alert](https://kisanwani.com/maharashtra-weather-orange-alert/): किसानवाणी : राज्यात पुन्हा एकदा पावसाने जोर धरायला सुरुवात केली (Maharashtra Weather Orange Alert) असून पुढील काही दिवसांत विशेषतः कोकण आणि विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केली आहे. राज्यातील विविध भागांमध्ये पावसाचे पुनरागमन झाल्याने शेतकरी, नागरिक आणि प्रशासनाला सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आजपासून कोकण आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून काही ठिकाणी वादळी पावसासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. - [Tractor Anudan 2026 | ट्रॅक्टर खरेदीसाठी ₹5 लाखांपर्यंत अनुदान; पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रे](https://kisanwani.com/tractor-anudan-2026/): किसानवाणी : शेतीतील वाढते यांत्रिकीकरण लक्षात घेता केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना आधुनिक कृषी यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्यासाठी विविध योजना (Tractor Anudan 2026) राबविल्या जात आहेत. त्यापैकी Sub-Mission on Agricultural Mechanization (SMAM) अर्थात कृषी यांत्रिकीकरण योजना ही महत्त्वाची योजना असून, या योजनेअंतर्गत ट्रॅक्टर खरेदीसाठी पात्र शेतकऱ्यांना थेट अनुदान दिले जाते. ट्रॅक्टरची किंमत लाखो रुपयांमध्ये असल्यामुळे अनेक लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना तो खरेदी करणे आर्थिकदृष्ट्या शक्य होत नाही. अशा परिस्थितीत ही योजना मोठा दिलासा देणारी ठरत आहे. - [भात रोपवाटिकेसाठी नवे मार्गदर्शन; बीजप्रक्रिया, खत आणि ‘रहू’ पद्धतीची संपूर्ण माहिती | Paddy Crop Advisory Rahu Method](https://kisanwani.com/paddy-crop-advisory-rahu-method/): किसानवाणी : भात रोपवाटिकेची वेळेत पेरणी, योग्य खत व्यवस्थापन आणि मोड (Paddy Crop Advisory Rahu Method) आलेल्या बियाण्यांचा वापर केल्यास निरोगी रोपे तयार होऊन पुढील लागवडीस मोठी मदत होणार आहे. - [कोकणात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट; विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातही पावसाची शक्यता, IMD चा अंदाज | Maharashtra Weather IMD Weather Forecast](https://kisanwani.com/maharashtra-weather-imd-weather-forecast/): किसानवाणी : राज्यात मान्सूनचा प्रभाव पुन्हा वाढू लागला असून अनेक भागांत पावसाने हजेरी (Maharashtra Weather IMD Weather Forecast) लावण्यास सुरुवात केली आहे. काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू असताना, कोकणात मात्र पुढील काही दिवस पावसाचा जोर अधिक वाढण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केली आहे. याशिवाय विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांतही हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. - [Teak Rising Demand | सागवानाला वाढती मागणी; महाराष्ट्र सरकारच्या ऐतिहासिक निर्णयामुळे शेतकऱ्यांसाठी नवी संधी](https://kisanwani.com/teak-rising-demand/): महाराष्ट्र शासनाने ९ जून २०२६ रोजी घेतलेला एक महत्त्वपूर्ण निर्णय राज्यातील वनशेतीच्या दृष्टीने ऐतिहासिक ठरत आहे. महाराष्ट्र वृक्षतोड (नियमन) अधिनियम, १९६४ अंतर्गत साग किंवा सागवान (Teak Rising Demand) या प्रजातीला नियमनाधीन वृक्षांच्या यादीतून वगळण्यात आले आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतात लागवड केलेल्या सागवानाची तोड करण्यासाठी पूर्वीप्रमाणे गुंतागुंतीच्या प्रशासकीय प्रक्रियेला सामोरे जावे लागणार नाही. पहिल्या दृष्टीक्षेपात हा केवळ प्रशासकीय बदल वाटत असला, तरी सागवानाचा इतिहास आणि त्याचे आर्थिक महत्त्व पाहता हा निर्णय दोनशे वर्षांहून अधिक काळ अस्तित्वात असलेल्या नियामक व्यवस्थेच्या समाप्तीचे प्रतीक मानला जात आहे. - [टोकण यंत्राने बियाणे लागवड करा; कमी बियाण्यात योग्य रोपसंख्या आणि उत्पादनात मोठी वाढ | Seed Sowing Equipment](https://kisanwani.com/seed-sowing-equipment/): किसानवाणी : हवामानातील सातत्याने होणारे बदल, अनियमित पाऊस, दीर्घकालीन पावसाचा खंड किंवा अतिवृष्टीमुळे शेतात पाणी साचणे यांसारख्या परिस्थितीचा पिकांच्या वाढीवर आणि उत्पादनावर मोठा परिणाम (Seed Sowing Equipment) होत आहे. अशा परिस्थितीत पावसाचे जास्तीत जास्त पाणी जमिनीत मुरविणे, अतिरिक्त पाण्याचा सुरक्षित निचरा करणे आणि पिकांच्या मुळांच्या वाढीसाठी अनुकूल जमीन तयार करणे अत्यंत आवश्यक ठरते. यासाठी रुंद वाफ्यावर लागवड पद्धतीबरोबरच टोकण यंत्राद्वारे बियाणे पेरणी ही आधुनिक आणि प्रभावी पद्धत मानली जाते. - [Farmer Compensation | अवकाळीग्रस्त १.३४ लाख शेतकऱ्यांना ३३४ कोटींची मदत मंजूर; डीबीटीने थेट खात्यात जमा होणार पैसे](https://kisanwani.com/farmer-compensation/): किसानवाणी : राज्यात ऑक्टोबर २०२५ ते एप्रिल २०२६ या कालावधीत अवकाळी पाऊस आणि कडाक्याच्या थंडीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीसाठी राज्य सरकारने मोठा (Farmer Compensation) निर्णय घेतला आहे. कोकणातील आंबा आणि काजू उत्पादकांसह राज्यातील विविध जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना एकूण ३३४ कोटी ९८ लाख रुपयांच्या मदतीला मंजुरी देण्यात आली असून ही रक्कम तातडीने लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विधानसभेत शुक्रवारी (ता.२६) ही माहिती देण्यात आली. - [Heavy Rain Update | कोकण, पुण्यासह 4 जिल्ह्यांना जोरदार पावसाचा येलो अलर्ट; राज्यभर वादळी पावसाची शक्यता](https://kisanwani.com/heavy-rain-update/): किसानवाणी : राज्यात मॉन्सून सक्रिय असला तरी गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याचे चित्र दिसत आहे. मात्र, भारतीय हवामान विभागाने (IMD) आज (ता. २७) कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये जोरदार पावसाचा इशारा दिला असून, राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि वादळी पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे संबंधित जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला असून नागरिकांनी तसेच शेतकऱ्यांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. - [भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना : फळबाग उभारणीसाठी १००% अनुदान; जाणून घ्या पात्रता, अनुदान, आवश्यक कागदपत्रे |  Bhausaheb Fundkar Phalbaag Lagvad Yojana](https://kisanwani.com/bhausaheb-fundkar-phalbaag-lagvad-yojana/): Bhausaheb Fundkar Phalbaag Lagvad Yojana: राज्यात फळबाग लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी राज्य शासनाने भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सुरू केली आहे. सन २०१८-१९ पासून ही योजना नव्याने राबविण्यात येत असून, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवडीचा लाभ घेऊ न शकणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येतो. ही योजना राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत राबविली जाते. विशेष म्हणजे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना तब्बल १०० टक्के अनुदान दिले जाते. - [गोदाम व्यवस्थापन आणि पुरवठा साखळी; उद्योगांच्या यशाचा मजबूत पाया | Warehouse Supply Chain Management](https://kisanwani.com/warehouse-supply-chain-management/): किसानवाणी : आजच्या वेगवान व्यावसायिक वातावरणात गोदाम (Warehouse Supply Chain Management) हे केवळ वस्तू साठवण्याचे ठिकाण राहिलेले नाही, तर संपूर्ण पुरवठा साखळीतील (Supply Chain) एक महत्त्वाचा आणि धोरणात्मक घटक बनले आहे. उत्पादन तयार झाल्यानंतर ते योग्य वेळेत, योग्य प्रमाणात आणि योग्य गुणवत्तेसह ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी गोदाम व्यवस्थापनाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. उद्योग, ई-कॉमर्स, किरकोळ व्यापार, औषधनिर्मिती, कृषी प्रक्रिया आणि उत्पादन क्षेत्रातील व्यवसायांसाठी प्रभावी गोदाम व्यवस्थापन हे स्पर्धात्मक यशाचे प्रमुख कारण ठरत आहे. - [मका लागवडीतून दुप्पट नफा ; मूल्यवर्धनाची ही संधी चुकवू नका.. | Maize Value Chain Corn Farming](https://kisanwani.com/maize-value-chain-corn-farming/): किसानवाणी : भारतातील कृषी क्षेत्रामध्ये मक्याचे पीक दिवसेंदिवस अधिक महत्त्वाचे ठरत आहे. पारंपरिक अन्नधान्य म्हणून ओळख असलेल्या मक्याचा वापर आता केवळ मानवी आहारापुरता मर्यादित राहिलेला नाही. पशुखाद्य, कुक्कुटपालन, स्टार्च उद्योग, खाद्यप्रक्रिया, बायोफ्युएल, एथेनॉल निर्मिती ((Maize Value Chain Corn Farming) तसेच विविध औद्योगिक उत्पादनांमध्ये मक्याची मोठ्या प्रमाणावर मागणी वाढत आहे. त्यामुळे मक्याचे उत्पादन वाढविण्याबरोबरच त्याचे योग्य साठवण, प्रक्रिया, मूल्यवर्धन आणि प्रभावी विपणन यांना अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. यालाच "मका मूल्यसाखळी विकास" असे संबोधले जाते. - [बियाण्यांची उगवण का कमी होते? जाणून ‘घ्या’ ७ महत्त्वाची कारणे | Seed Germination Seed Quality](https://kisanwani.com/seed-germination-seed-quality/): शेतीमध्ये चांगले उत्पादन मिळवण्यासाठी दर्जेदार बियाण्यांची निवड जितकी महत्त्वाची आहे, तितकीच त्या बियाण्यांची उगवणक्षमताही महत्त्वाची असते. बियाणे पेरल्यानंतर त्यापासून निरोगी रोपांची निर्मिती होणे म्हणजेच बियाण्यांची उगवण. जर बियाण्यांची उगवणक्षमता कमी असेल, तर पिकांची संख्या कमी होते, शेतात विरळ उगवण दिसून येते आणि त्याचा थेट परिणाम उत्पादनावर होतो. त्यामुळे बियाण्यांच्या उगवणक्षमतेवर परिणाम करणारे घटक समजून घेणे प्रत्येक शेतकऱ्यासाठी आवश्यक आहे. - [७/१२ उताऱ्यांतील सर्वात मोठा घोटाळा! शेतकऱ्यांची फसवणूक, ४२४ बेकायदेशीर फेरफार प्रकरणे उघड | Satbara Scam 7/12 Land Record](https://kisanwani.com/satbara-scam-7-12-land-record/): किसानवाणी : राज्यातील शेतकऱ्यांच्या जमिनींच्या ७/१२ उताऱ्यांमध्ये बेकायदेशीर फेरफार (Satbara Scam 7/12 Land Record) करून मोठ्या प्रमाणावर फसवणूक झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. शुद्धलेखन दुरुस्तीच्या नावाखाली महाराष्ट्र जमीन महसूल संहितेतील कलम १५५ चा गैरवापर करून जमिनींच्या नोंदींमध्ये विनापरवाना बदल करण्यात आल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणाची दखल विधानसभेत घेतली गेली असून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी लेखी उत्तराद्वारे महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, तपासणीदरम्यान एकूण ४२४ प्रकरणांमध्ये अनियमितता आढळून आली असून या प्रकरणांमुळे अनेक शेतकऱ्यांच्या जमिनींच्या नोंदींमध्ये बेकायदेशीर बदल झाल्याचे स्पष्ट झाले आहे. - [आंबिया बहरातील मोसंबीची फळगळ कशी कमी कराल? जाणून ‘घ्या’ प्रभावी उपाय | Sweet Lime Ambia Bahar](https://kisanwani.com/sweet-lime-ambia-bahar/): किसानवाणी : मोसंबी पिकामध्ये आंबिया बहर (Sweet Lime Ambia Bahar) हा अत्यंत महत्त्वाचा बहर मानला जातो. या काळात फुलधारणा चांगली होत असली तरी अनेक बागांमध्ये मोठ्या प्रमाणावर फळगळ होत असल्याने शेतकऱ्यांचे उत्पादन आणि आर्थिक उत्पन्न दोन्ही कमी होते. फळगळ ही पूर्णपणे थांबविणे शक्य नसले तरी योग्य वेळी योग्य व्यवस्थापन केल्यास तिचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी करता येते. यासाठी पाणी व्यवस्थापन, अन्नद्रव्यांचा समतोल पुरवठा, संजीवकांचा योग्य वापर, कीड-रोग नियंत्रण आणि हवामानानुसार बागेची निगा राखणे अत्यंत आवश्यक आहे. - [Maharashtra Rain Forecast Yellow Alert| राज्यात मेघगर्जना, विजांसह वादळी पावसाची शक्यता; अनेक जिल्ह्यांसाठी हवामान विभागाचा येलो अलर्ट](https://kisanwani.com/maharashtra-rain-forecast-yellow-alert/): किसानवाणी : मॉन्सूनने संपूर्ण महाराष्ट्र (Maharashtra Rain Forecast Yellow Alert) व्यापल्यानंतर राज्यातील पावसाचा जोर कमी-अधिक होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. भारतीय हवामान विभागाने आज (ता. २६ जून) राज्यातील विविध भागांसाठी महत्त्वाचा हवामान अंदाज जाहीर केला असून कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. त्याचबरोबर राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला असून नागरिकांनी तसेच शेतकऱ्यांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. - [सीड बॉल निर्मिती : वृक्षलागवड आणि पर्यावरण संवर्धनासाठी प्रभावी उपाय | Seed Ball Making](https://kisanwani.com/seed-ball-making/): किसानवाणी : पर्यावरण संवर्धन, जैवविविधतेचे जतन आणि वृक्षलागवडीला चालना देण्यासाठी सीड बॉल (Seed Ball Making) निर्मिती ही एक अत्यंत प्रभावी आणि सोपी पद्धत मानली जाते. वाढते शहरीकरण, जंगलतोड आणि हवामान बदलाच्या परिणामांमुळे हरित क्षेत्रांमध्ये सातत्याने घट होत आहे. अशा परिस्थितीत कमी खर्चात आणि कमी मनुष्यबळाच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करण्यासाठी सीड बॉल तंत्रज्ञान उपयुक्त ठरत आहे. - [भारतात 152 जैवसंपोषित पिकांच्या जाती विकसित; हरित अर्थव्यवस्थेला मिळणार मोठी चालना.. | Biofortified Crops Green Economy](https://kisanwani.com/biofortified-crops-green-economy/): किसानवाणी : भारतामध्ये कृषी क्षेत्र अधिक शाश्वत, पोषणसमृद्ध आणि पर्यावरणपूरक (Biofortified Crops Green Economy) बनवण्यासाठी विविध स्तरांवर मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत. सूक्ष्म सिंचनाचा विस्तार १५ दशलक्ष हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर झाला असून डिजिटल ॲग्रिकल्चर मिशन अंतर्गत १४० दशलक्ष शेतकऱ्यांचा डेटा तयार करण्याचे काम सुरू आहे. याशिवाय १०,००० पेक्षा अधिक शेतकरी उत्पादक कंपन्यांना (FPOs) प्रोत्साहन देण्यात येत असून त्याचा लाभ सुमारे ३० दशलक्ष शेतकऱ्यांना मिळत आहे. अन्न प्रक्रिया उद्योग दरवर्षी ७ ते ८ टक्क्यांच्या दराने वाढत असला तरी धान्यांमध्ये ५ ते १० टक्के आणि फळे-भाज्यांमध्ये सुमारे २० टक्क्यांपर्यंत काढणीनंतरचे नुकसान होत असल्याने सुधारणा करण्यासाठी मोठी संधी उपलब्ध आहे. - [पॉलिहाउस शेतीत यश हवे? मग जागा आणि दिशा निवडताना करू नका या चुका… | Polyhouse Farming Protected Cultivation](https://kisanwani.com/polyhouse-farming-protected-cultivation/): किसानवाणी : पॉलिहाउस शेती ही आधुनिक आणि तंत्रज्ञानाधारित शेती पद्धती (Polyhouse Farming Protected Cultivation) असून कमी क्षेत्रातून अधिक उत्पादन आणि दर्जेदार माल मिळवण्यासाठी ती प्रभावी पर्याय मानली जाते. मात्र पॉलिहाउस प्रकल्पाचे यश केवळ संरचना उभारण्यावर अवलंबून नसून योग्य जागेची निवड, शास्त्रोक्त दिशेने उभारणी, पाण्याची उपलब्धता, बाजारपेठेचे नियोजन आणि तांत्रिक व्यवस्थापन यांसारख्या अनेक घटकांवर अवलंबून असते. सुरुवातीच्या टप्प्यात घेतलेले योग्य निर्णय पुढील १० ते १५ वर्षांच्या उत्पादनक्षमतेवर थेट परिणाम करतात. त्यामुळे पॉलिहाउस उभारण्यापूर्वी सखोल नियोजन करणे अत्यंत आवश्यक आहे. - [मुसळधार पावसाचा इशारा! कोकणातील शेतकऱ्यांनी तातडीने घ्या ‘ही’ काळजी; कृषी विभागाचा सल्ला.. | Konkan Agriculture Crop Advisory](https://kisanwani.com/konkan-agriculture-crop-advisory/): किसानवाणी : कोकण विभागातील शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाने महत्त्वपूर्ण पीक सल्ला (Konkan Agriculture Crop Advisory) जारी केला असून आगामी काळात मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा येण्याची शक्यता लक्षात घेऊन विविध पिकांसाठी आवश्यक उपाययोजनांची माहिती देण्यात आली आहे. विशेषतः नव्याने लागवड केलेल्या सुपारी व नारळाच्या रोपांचे तसेच आंबा आणि काजू कलमांचे वादळी वाऱ्यामुळे नुकसान होऊ नये यासाठी त्यांना काठ्यांचा आधार देण्याचा सल्ला देण्यात आला आहे. - [मोठी बातमी: खत लिंकिंगवर अखेर बंदी; शेतकऱ्यांना जबरदस्तीने इतर उत्पादने विकता येणार नाहीत | Maharashtra Fertiliser Linking Dattatray Bharane](https://kisanwani.com/maharashtra-fertiliser-linking-dattatray-bharane/): किसानवाणी : राज्यातील शेतकऱ्यांना अनुदानित खत खरेदी करताना इतर उत्पादने सक्तीने खरेदी करण्यास भाग पाडले जाण्याच्या तक्रारींची दखल घेत महाराष्ट्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. उत्तर प्रदेश सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्रातही अनुदानित खतांसोबत इतर उत्पादने ‘लिंकिंग’ करून विक्री करण्यास बंदी घालण्यात येणार असल्याची माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे (Maharashtra Fertiliser Linking Dattatray Bharane) यांनी विधानसभेत लेखी उत्तराद्वारे दिली. - [द्राक्ष उत्पादकांसाठी महत्त्वाची बातमी! पुढील आठवडाभर करपा रोगाचा धोका जाणून ‘घ्या’ संपूर्ण अंदाज… | Grape Farming Blight Disease](https://kisanwani.com/grape-farming-blight-disease/): किसानवाणी : महाराष्ट्रात मॉन्सूनने पुन्हा जोर धरल्याने राज्यभरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असला, तरी द्राक्ष उत्पादकांसाठी आगामी काही दिवस सावधगिरीचे ठरणार आहेत. वातावरणातील बदल, वाढलेली सापेक्ष आर्द्रता, ढगाळ हवामान आणि अधूनमधून होणारा पाऊस यामुळे द्राक्ष बागांमध्ये करपा (Grape Farming Blight Disease) रोगाचा धोका वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. - [महाराष्ट्रात मॉन्सूनची सर्वदूर हजेरी; अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, कोकणात अतिवृष्टी | Maharashtra Rain Forecast](https://kisanwani.com/maharashtra-rain-forecast/): किसानवाणी : राज्यात नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (Maharashtra Rain Forecast) अखेर संपूर्ण महाराष्ट्र व्यापला असून सर्वदूर कमी-अधिक प्रमाणात पावसाची हजेरी लागली आहे. हवामान विभागाने आज (२५ जून) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तविली असून संबंधित भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर कोकणासह उर्वरित राज्यात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज असल्याने यलो अलर्ट देण्यात आला आहे. - [तुरीचे उत्पादन दुप्पट करायचे आहे? वाण निवडताना या गोष्टींची ‘घ्या’ काळजी | Tur Farming Variety](https://kisanwani.com/tur-farming-variety/): किसानवाणी : खरीप हंगामात तूर हे महाराष्ट्रातील प्रमुख कडधान्य पीक मानले जाते. तुरीच्या (Tur Farming Variety) उत्पादनावर योग्य वाणाची निवड मोठ्या प्रमाणात परिणाम करत असते. अनेक शेतकरी खत व्यवस्थापन, सिंचन आणि कीड-रोग नियंत्रणाकडे लक्ष देतात, मात्र सुरुवातीलाच योग्य वाणाची निवड न झाल्यास अपेक्षित उत्पादन मिळणे कठीण होते. त्यामुळे तुरीचे वाण निवडताना काही महत्त्वाच्या बाबींचा विचार करणे आवश्यक आहे. - [कर्जमाफीतून 12.71 लाख शेतकरी वंचित? सरकारच्या अटींवर विधानसभेत मोठा गदारोळ | Maharashtra Farm Loan Waiver](https://kisanwani.com/maharashtra-farm-loan-waiver/): किसानवाणी : राज्य सरकारच्या प्रस्तावित कर्जमाफी योजनेतील (Maharashtra Farm Loan Waiver) अटींवरून विधानसभेत पुन्हा एकदा जोरदार राजकीय संघर्ष पाहायला मिळाला. २०१९ च्या कर्जमाफीतील निकष कायम ठेवल्यामुळे राज्यातील तब्बल १२ लाख ७१ हजार शेतकरी यंदाच्या कर्जमाफीपासून वंचित राहणार असल्याचा गंभीर आक्षेप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार कैलास पाटील यांनी मांडला. सरकारने घातलेल्या अटींमुळे मोठ्या संख्येने शेतकऱ्यांना लाभ मिळणार नसल्याचे सांगत त्यांनी सभागृहात तीव्र नाराजी व्यक्त केली. - [अखेर संपूर्ण महाराष्ट्रात मॉन्सून दाखल; अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट.. | Maharashtra Weather Update Orange Alert](https://kisanwani.com/maharashtra-weather-update-orange-alert/): किसानवाणी : महाराष्ट्रातील शेतकरी आणि नागरिकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली (Maharashtra Weather Update Orange Alert) असून नैऋत्य मोसमी वारे अर्थात मॉन्सूनने अखेर संपूर्ण महाराष्ट्र व्यापला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने बुधवारी (ता. २४) याबाबत अधिकृत माहिती दिली. गेल्या काही दिवसांपासून मॉन्सूनची वाटचाल वेगाने सुरू असून उत्तर मध्य महाराष्ट्र आणि उत्तर विदर्भातील उर्वरित भागही मॉन्सूनच्या कक्षेत आले आहेत. त्यामुळे आता राज्यातील सर्व भागांमध्ये पावसाच्या सरी सक्रिय होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. - [लाडक्या बहिणींना पुन्हा ई-केवायसीची संधी मिळणार? आदिती तटकरेंनी दिले स्पष्ट उत्तर… | Ladki Bahin Yojana eKYC Aditi Tatkare](https://kisanwani.com/ladki-bahin-yojana-ekyc-aditi-tatkare/): किसानवाणी : राज्यातील लाखो महिलांना आर्थिक आधार देणाऱ्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ (Ladki Bahin Yojana eKYC Aditi Tatkare) योजनेच्या संदर्भात ई-केवायसी प्रक्रियेबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. विधानसभेत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ई-केवायसी पूर्ण न केलेल्या लाभार्थी महिलांचा योजनेचा लाभ थांबविण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे यापुढे अशा महिलांना पुन्हा संधी मिळणार का, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. - [सावधान! दूध, तूप, मसालेसह ‘या’ पदार्थांमध्ये होऊ शकते भेसळ; अशी करा शुद्धतेची ओळख | Food Safety Food Adulteration](https://kisanwani.com/food-safety-food-adulteration/): किसानवाणी : अन्न हे मानवाच्या आरोग्याचा पाया मानले जाते. निरोगी जीवनासाठी पौष्टिक, स्वच्छ आणि सुरक्षित अन्नाचे ( Food Safety Food Adulteration) सेवन करणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र वाढत्या बाजारपेठेमध्ये नफेखोरीच्या उद्देशाने अनेक खाद्यपदार्थांमध्ये भेसळ केली जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत. अन्नातील भेसळ ही केवळ ग्राहकांची फसवणूक नसून ती आरोग्यासाठी गंभीर धोका निर्माण करणारी समस्या आहे. त्यामुळे प्रत्येक ग्राहकाने भेसळयुक्त अन्न ओळखण्याची माहिती असणे आवश्यक ठरते. - [महिला शेतकऱ्यांना मिळणार कायदेशीर दर्जा? महाराष्ट्र सरकारचे मोठे पाऊल… | Women Farmers Maharashtra Agriculture](https://kisanwani.com/women-farmers-maharashtra-agriculture/): किसानवाणी : महाराष्ट्रातील कृषी क्षेत्रात महिलांचा (Women Farmers Maharashtra Agriculture) सहभाग ८१ टक्क्यांहून अधिक असल्याचे विविध अभ्यासांतून समोर आले आहे. पेरणीपासून कापणीपर्यंत, पशुपालनापासून दुग्ध व्यवसायापर्यंत आणि मत्स्यव्यवसायापासून कुक्कुटपालनापर्यंत ग्रामीण अर्थव्यवस्थेचा मोठा भार महिला सांभाळत असल्या तरी आजही त्यांना स्वतंत्र शेतकरी म्हणून मान्यता मिळालेली नाही. बहुतांश शासकीय योजना, कृषी धोरणे आणि अनुदान योजनांचा लाभ घेण्यासाठी जमिनीची मालकी ही मूलभूत अट असल्याने लाखो महिला शेतकरी विविध लाभांपासून वंचित राहतात. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकार महिला शेतकऱ्यांना कायदेशीर दर्जा देण्यासाठी स्वतंत्र विधेयक आणण्याच्या तयारीत असून हे पाऊल कृषी क्षेत्रातील ऐतिहासिक बदल ठरू शकते. - [MahaBeej Recruitment 2026 | महाबीजमध्ये १९० कृषी सहायक पदांची भरती; कृषी पदवीधरांसाठी मोठी संधी](https://kisanwani.com/mahabeej-recruitment-2026/): किसानवाणी : महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (MahaBeej Recruitment 2026) मध्ये अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुधारित आकृतीबंधाला अखेर राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे महाबीजच्या प्रशासकीय आणि तांत्रिक कामकाजाला मोठी चालना मिळणार असून कृषी क्षेत्रातील युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. विशेष म्हणजे नव्या आकृतीबंधामध्ये कृषी सहायकांची तब्बल १९० पदे मंजूर करण्यात आली असून येत्या काळात ही पदे भरली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. - [दुष्काळाचा मोठा इशारा ! राज्य सरकारने तातडीने ‘ही’ योजना लागू करावी; डॉ. लाखे पाटील यांची मागणी | Drought Management](https://kisanwani.com/drought-management/): किसानवाणी : संभाव्य दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कोणताही विलंब न करता राज्य, जिल्हा आणि तालुका स्तरावरील दुष्काळ आपत्ती व्यवस्थापन योजना (Drought Management) तयार करून तिची तातडीने अंमलबजावणी सुरू करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे माजी तज्ज्ञ सदस्य तसेच शिवसेना सचिव डॉ. संजय लाखे पाटील यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांना निवेदन सादर केले आहे. - [“तूर शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय! आता सरकारच करणार थेट खरेदी, पैसे थेट खात्यात” | Amit Shah](https://kisanwani.com/amit-shah/): नवी दिल्ली : तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत थेट खरेदी आणि पारदर्शक व्यवहार सुनिश्चित करण्यासाठी विशेष ऑनलाइन पोर्टल सुरू केले आहे. केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या हस्ते नवी दिल्लीत या पोर्टलचे उद्घाटन करण्यात आले. नॅशनल ॲग्रीकल्चरल को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया (NAFED) आणि नॅशनल को-ऑपरेटिव्ह कन्झ्युमर्स फेडरेशन ऑफ इंडिया (NCCF) यांनी संयुक्तपणे हे पोर्टल विकसित केले आहे. - [बीजप्रक्रियेचा योग्य क्रम कोणता? FIR नियम जाणून ‘घ्या’ | Seed Treatment Germination](https://kisanwani.com/seed-treatment-germination/): किसानवाणी : पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करणे (Seed Treatment Germination) ही शेतीतील अत्यंत महत्त्वाची आणि कमी खर्चात होणारी प्रक्रिया मानली जाते. बियाण्यांची निरोगी उगवण, सुरुवातीच्या अवस्थेतील कीड व रोगांपासून संरक्षण आणि पिकांच्या चांगल्या वाढीसाठी बीजप्रक्रिया उपयुक्त ठरते. मात्र बीजप्रक्रिया करताना काही महत्त्वाचे नियम पाळणे आवश्यक असते. शिफारस केलेली औषधे, प्रक्रिया करण्याची योग्य पद्धत, औषधांचा क्रम, जैविक खतांचा वापर आणि सुरक्षितता यांकडे दुर्लक्ष केल्यास अपेक्षित फायदा मिळू शकत नाही. - [मॉन्सूनचा वेगवान प्रवास! अवघ्या 24 तासांत मुंबई गाठली, वर्ध्यापर्यंत मजल | Monsoon Update Mumbai Rain](https://kisanwani.com/monsoon-update-mumbai-rain/): किसानवाणी : महाराष्ट्रासह देशातील विविध भागांमध्ये नैऋत्य मोसमी वाऱ्यांची अर्थात मॉन्सूनची आगेकूच पुन्हा वेगाने सुरू झाली आहे. मागील दोन आठवड्यांपासून मॉन्सूनचा प्रवास काहीसा मंदावला होता. मात्र आता वातावरणातील अनुकूल परिस्थितीमुळे मॉन्सूनने पुन्हा गती घेतली असून अवघ्या २४ तासांत मोठी मजल मारत मुंबईसह (Monsoon Update Mumbai Rain) विदर्भातील वर्ध्यापर्यंत पोहोचला आहे. हवामानशास्त्र विभागाने मंगळवारी (ता. २३) याबाबत अधिकृत माहिती दिली. - [महाराष्ट्रातील देशी पशुधन धोक्यात? जाणून ‘घ्या’ संवर्धन का झाले अत्यावश्यक…| Maharashtra Livestock Biodiversity](https://kisanwani.com/maharashtra-livestock-biodiversity/): किसानवाणी : महाराष्ट्र हा कृषिप्रधान राज्य असून शेतीबरोबरच पशुपालन (Maharashtra Livestock Biodiversity) हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ मानला जातो. राज्यात विविध प्रकारच्या देशी गायी, म्हशी, शेळ्या, मेंढ्या आणि कुक्कुट जाती आढळतात. या स्थानिक पशुधन जातींमध्ये विशिष्ट आनुवंशिक गुणधर्म, रोगप्रतिकारक क्षमता, स्थानिक हवामानाशी जुळवून घेण्याची क्षमता आणि कमी खर्चात उत्पादन देण्याची क्षमता असल्यामुळे त्यांचे संवर्धन अत्यंत महत्त्वाचे बनले आहे. बदलते हवामान, वाढते संकरीकरण आणि आधुनिक उत्पादन पद्धतींमुळे अनेक स्थानिक जातींचे अस्तित्व धोक्यात आले असून त्यांच्या जैवविविधतेचे संरक्षण करण्याची गरज अधिक तीव्र झाली आहे. - [फायटोप्थोरा रोगाचा वाढता धोका; ‘गादीवाफा’ लागवड ठरते रामबाण उपाय | Phytophthora Disease](https://kisanwani.com/phytophthora-disease/): किसानवाणी : पावसाळ्यात अनेक भाजीपाला, फळबाग तसेच नगदी पिकांमध्ये फायटोप्थोरा (Phytophthora Disease) या बुरशीसदृश रोगाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव आढळून येतो. हा रोग विशेषतः जास्त आर्द्रता, सतत ओलसर जमीन आणि पाण्याचा निचरा न होणाऱ्या शेतांमध्ये झपाट्याने वाढतो. त्यामुळे पिकांच्या मुळांवर, खोडावर आणि फळांवर गंभीर परिणाम होऊन उत्पादनात मोठी घट येऊ शकते. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी रोग नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक ठरते. - [कोकणात मुसळधार पावसाची शक्यता; विदर्भात ऑरेंज अलर्ट जारी | Maharashtra Monsoon 2026](https://kisanwani.com/maharashtra-monsoon-2026/): राज्यात मॉन्सूनची पुन्हा गती वाढू लागल्याने अनेक भागांमध्ये पावसाच्या सरी कोसळण्यास (Maharashtra Monsoon 2026) सुरुवात झाली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) आज, २३ जून २०२६ रोजी विदर्भातील काही जिल्ह्यांसाठी उष्ण हवामान आणि वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला असून, मुंबईसह संपूर्ण कोकण पट्ट्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तविली आहे. राज्यातील इतर भागांमध्येही तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज असल्याने येलो अलर्ट देण्यात आला आहे. - [यंदा बाजरी लागवडीचे तिहेरी फायदे; धान्य, चारा आणि दुष्काळापासून संरक्षण | Bajra Farming Pearl Millet](https://kisanwani.com/bajra-farming-pearl-millet/): किसानवाणी : यंदाच्या खरीप हंगामात बाजरीची लागवड शेतकऱ्यांसाठी तिहेरी फायदे देणारी ठरू शकते, कमी पाण्यातही चांगले उत्पादन देण्याची क्षमता , जनावरांसाठी पौष्टिक चारा आणि माणसांसाठी पोषक अन्नधान्य उपलब्ध करून देण्याची क्षमता यामुळे बाजरी हे पीक सध्याच्या बदलत्या हवामान परिस्थितीत अधिक महत्त्वाचे ठरत आहे. - [जांभळाची नासाडी थांबवा! ‘या’ यंत्रातून तासाला 80 किलो गर, बियांमधूनही कमाई | Jamun Processing Pulp Machine](https://kisanwani.com/jamun-processing-pulp-machine/): किसानवाणी : पूर्वी प्रामुख्याने रानमेवा म्हणून ओळखले जाणारे जांभूळ (Jamun Processing Pulp Machine) पूर्वी प्रामुख्याने रानमेवा म्हणून ओळखले जाणारे जांभूळ आता व्यावसायिक शेतीतही आपले स्थान निर्माण करत आहे. भारतातील सदाहरित आणि औषधी गुणधर्मांनी समृद्ध फळझाडांमध्ये जांभळाची गणना केली जाते. गडद जांभळ्या-काळ्या रंगाची, आंबट-गोड आणि किंचित तुरट चव असलेली ही फळे पौष्टिकतेबरोबरच आरोग्यवर्धक गुणधर्मांसाठी प्रसिद्ध आहेत. जांभळामध्ये लोह, कॅल्शिअम, प्रथिने, कर्बोदके, तंतुमय पदार्थ आणि विविध अँटिऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळतात. विशेष म्हणजे फळ, बिया, पाने आणि साल यांचा औषधनिर्मितीत वापर केला जातो. जांभळाच्या बियांमध्ये आढळणारे जॅम्बोलीनसारखे जैवसक्रिय घटक रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. - [शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर ! 48 तासांत मोठा बदल; मॉन्सून पुन्हा सक्रिय ! |Monsoon Update Pune Weather](https://kisanwani.com/monsoon-update-pune-weather/): किसानवाणी : राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली (Monsoon Update Pune Weather) असून अखेर दोन आठवड्यांच्या खंडानंतर मॉन्सूनने पुन्हा आगेकूच सुरू केली आहे. यंदा राज्यात ८ जून रोजी मॉन्सूनचे आगमन झाले होते. त्यावेळी मॉन्सूनने कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भाग व्यापला होता. मात्र त्यानंतर वातावरणातील बदल आणि पुढील वाटचालीसाठी आवश्यक असलेल्या पोषक परिस्थितीचा अभाव यामुळे मॉन्सूनची प्रगती जवळपास दोन आठवडे ठप्प झाली होती. त्यामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाने दडी मारली होती आणि शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. - [शेजारच्या शेतकऱ्याने रस्ता अडवला? कायदेशीर मार्गाने हक्काचा रस्ता कसा मिळवाल? | Farmland Road Dispute](https://kisanwani.com/farmland-road-dispute/): किसानवाणी : शेतकऱ्यांसाठी शेतापर्यंत पोहोचण्याचा रस्ता ही अत्यंत महत्त्वाची गरज आहे. पेरणी, फवारणी, खत व्यवस्थापन, पीक काढणी तसेच शेतीमालाची वाहतूक यासाठी शेतरस्ता आवश्यक असतो. मात्र अनेक ठिकाणी शेतरस्त्यांवरून वाद निर्माण होत असल्याचे दिसून येते. काही वेळा पूर्वापार वापरात असलेला रस्ता शेजारील शेतकरी अडवतात, तर काही शेतजमिनींना जाण्यासाठी कोणताही अधिकृत रस्ताच उपलब्ध नसतो. अशा परिस्थितीत संबंधित शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. - [होर्मुज सामुद्रीधुनी खुली; शेतकऱ्यांना मोठा दिलासा! युरियाची 3.3 लाख टनांची खेप भारताकडे रवाना | Hormuz Strait Urea Supply](https://kisanwani.com/hormuz-strait-urea-supply/): किसानवाणी : खरीप हंगामाच्या तोंडावर देशातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून पश्चिम आशियातील भू-राजकीय घडामोडींमुळे खतांच्या आंतरराष्ट्रीय ( Hormuz Strait Urea Supply) पुरवठा साखळीवर परिणाम झाला होता. विशेषतः युरिया आणि डीएपीसारख्या महत्त्वाच्या खतांच्या वाहतुकीत अडथळे निर्माण झाल्याने आगामी खरीप हंगामात खतटंचाई निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र आता परिस्थिती सुधारण्यास सुरुवात झाली असून युरिया खताची पहिली मोठी खेप भारताकडे रवाना झाल्याने शेतकऱ्यांसह कृषी क्षेत्राला मोठा दिलासा मिळाला आहे. - [काढणीनंतरचे नुकसान टाळायचे? शीतसाखळी आणि गुणवत्ता व्यवस्थापन ठरते ‘महत्त्वाचे’… | Agricultural Storage Cold Chain](https://kisanwani.com/agricultural-storage-cold-chain/): किसानवाणी : शेतीमधील उत्पादन वाढविण्यासाठी शेतकरी वर्षभर मेहनत घेत असतात. मात्र, उत्पादन घेतल्यानंतर त्याची योग्य साठवणूक न झाल्यास मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता असते. विशेषतः फळे, भाजीपाला, फुले, दुग्धजन्य पदार्थ आणि इतर नाशवंत कृषी उत्पादने यांची गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी शीतसाखळी (Agricultural Storage Cold Chain ) आणि गुणवत्ता व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे ठरते. उत्पादनापासून ते ग्राहकांपर्यंत पोहोचण्याच्या संपूर्ण प्रक्रियेत योग्य तापमान, आर्द्रता आणि स्वच्छता राखली गेल्यास उत्पादनाची गुणवत्ता अबाधित राहते आणि शेतकऱ्यांना अधिक चांगला दर मिळू शकतो. - [“उतिसंवर्धित रोपांपासून तयार करा दर्जेदार ऊस बेणे मळा” | Sugarcane Tissue Culture](https://kisanwani.com/sugarcane-tissue-culture/): किसानवाणी : ऊस उत्पादनामध्ये अधिक उत्पादन, दर्जेदार बेणे (Sugarcane Tissue Culture) आणि रोगमुक्त लागवड साहित्य मिळविण्यासाठी उतिसंवर्धित (टिश्यू कल्चर) रोपांचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. पारंपरिक पद्धतीने तयार केलेल्या बेण्यामध्ये अनेकदा रोगांचा प्रादुर्भाव, उगवण क्षमतेत घट तसेच उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता असते. याउलट उतिसंवर्धित रोपे वैज्ञानिक पद्धतीने तयार केली जात असल्यामुळे ती रोगमुक्त, जोमदार आणि एकसमान वाढ करणारी असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी अशा रोपांपासून ऊस बेणे मळा तयार केल्यास पुढील लागवडीसाठी उत्कृष्ट प्रतीचे बेणे उपलब्ध होऊ शकते. - [आरबीआयचा मोठा निर्णय! किसान क्रेडिट कार्डच्या नियमांत मोठे बदल, शेतकऱ्यांनी जाणून ‘घ्या’ नवे नियम | Kisan Credit Card](https://kisanwani.com/kisan-credit-card/): किसानवाणी : भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) किसान क्रेडिट कार्ड (Kisan Credit Card) योजनेच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल जाहीर केले आहेत. शेतकऱ्यांसाठी कर्ज मंजुरी प्रक्रिया, परतफेडीचे वेळापत्रक आणि पीक हंगामांच्या व्याख्येत एकसमानता आणण्याच्या उद्देशाने हे बदल करण्यात आले आहेत. आरबीआयने स्पष्ट केले आहे की, नव्या नियमांमुळे शेती आणि शेतीशी संलग्न व्यवसायांमध्ये कार्यरत असलेल्या शेतकरी व कर्जदारांना कर्ज उपलब्ध होण्याची प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शक होईल. हे सुधारित नियम जानेवारी २०२७ पासून देशभर लागू होणार आहेत. ## Pages - [Web-stories](https://kisanwani.com/web-stories/) - [Privacy Policy](https://kisanwani.com/privacy-policy-2/): Kisanwani is strongly committed to your right to privacy. We have put in place appropriate procedures to safeguard and help prevent unauthorized access, maintain data security, and correctly use the information we collect online. The information we collect in connection with our online forums and communities is used to provide an interactive experience. We use this information to facilitate participation in these online forums and communities from time to time.