आजचा हवामान इशारा: पुणे घाटमाथ्यावर रेड अलर्ट, मुंबईसह अनेक जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता | Heavy Rainfall Continues Across Konkan

ही माहिती सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहचवा

किसानवाणी : राज्यात मॉन्सूनने पुन्हा जोर धरला असून कोकण, घाटमाथा तसेच मध्य महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाचा तडाखा कायम आहे. भारतीय हवामान विभागाने आज (Heavy Rainfall Continues Across Konkan) पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यासाठी रेड अलर्ट कायम ठेवला असून, कोकण आणि घाटमाथ्यावरील अनेक भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. याशिवाय काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसासह विजांच्या कडकडाटाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, सध्या मॉन्सूनचा कमी दाबाचा पट्टा राजस्थानातील जैसलमेरपासून कोटा, गुना, दामोह, दाल्तोगंज मार्गे ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत सुमारे ३.१ किलोमीटर उंचीपर्यंत सक्रिय आहे. तसेच ईशान्य अरबी समुद्रापासून दक्षिण गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल, बांग्लादेश ते मणिपूरपर्यंत समुद्रसपाटीपासून ४.५ ते ७.६ किलोमीटर उंचीवर परस्परविरोधी वाऱ्यांचे जोड क्षेत्र सक्रिय आहे. याशिवाय आग्नेय राजस्थान आणि मध्य प्रदेश परिसरावर सुमारे ३.१ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. या सर्व हवामान प्रणालींमुळे महाराष्ट्रात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले असून अनेक भागांमध्ये जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडत आहे.

गेल्या २४ तासांतील हवामानाच्या नोंदींनुसार, जळगाव येथे राज्यातील सर्वाधिक २९.८ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली, तर महाबळेश्वर येथे राज्यातील नीचांकी १७.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले. राज्यभर ढगाळ वातावरण आणि सुरू असलेल्या पावसामुळे बहुतांश ठिकाणी कमाल तापमान २४ ते ३० अंश सेल्सिअस दरम्यान राहिले. दरम्यान, पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावरील ताम्हिणी येथे राज्यातील सर्वाधिक २८० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

आजच्या हवामान अंदाजानुसार, पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेऊन रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागात अतिवृष्टीमुळे स्थानिक पातळीवर पाणी साचणे, डोंगराळ भागात दरडी कोसळण्याचा धोका तसेच वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

याशिवाय पालघर, ठाणे, रायगड, नाशिक जिल्ह्याचा घाटमाथा तसेच सातारा घाटमाथा येथे अतिजोरदार पावसाची शक्यता असल्याने ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर घाटमाथ्यावरही जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून या भागांसाठी येलो अलर्ट लागू आहे.

विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागांमध्येही हवामान बदलाचे संकेत आहेत. नंदूरबार, नाशिक, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी तसेच शेतकऱ्यांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्हानिहाय अलर्ट : Heavy Rainfall Continues Across Konkan

अलर्टजिल्हे / भाग
रेड अलर्टपुणे जिल्ह्याचा घाटमाथा
ऑरेंज अलर्टपालघर, ठाणे, रायगड, नाशिक घाटमाथा, सातारा घाटमाथा
येलो अलर्ट (जोरदार पाऊस)मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाटमाथा
येलो अलर्ट (विजांसह वादळी पाऊस)नंदूरबार, नाशिक, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ

हेही वाचा : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीची पहिली यादी जाहीर; ५५३ शेतकऱ्यांना मिळणार थेट लाभ | Maharashtra Farm Loan Waiver Punyashlok Ahilyadevi Holkar Scheme

महाडीबीटीवर कॉटन श्रेडरसाठी अर्ज सुरू; शेतकऱ्यांना ७५ हजार रुपयांपर्यंत अनुदान, जाणून घ्या पात्रता व अर्ज प्रक्रिया | Cotton Shredder


ही माहिती सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहचवा