खरीप हंगाम 2025 पीकस्पर्धा निकाल जाहीर; कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची राज्यस्तरावर दमदार कामगिरी | Kharif Crop Competition 2025

ही माहिती सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहचवा

कोल्हापूर : राज्यातील पिकांची उत्पादकता वाढवणे, आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे आणि प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे या उद्देशाने कृषि विभागामार्फत आयोजित करण्यात आलेल्या ‘राज्यस्तरीय खरीप हंगाम 2025 पीक स्पर्धा’ (Kharif Crop Competition 2025) योजनेचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. या स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत राज्यस्तरावर अव्वल स्थान पटकावले आहे. विशेष म्हणजे सोयाबीन, भात, भुईमूग आणि नाचणी या विविध पिकांच्या उत्पादनात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उच्च उत्पादन घेत राज्यात आपला ठसा उमटवला आहे.

या पीक स्पर्धेत राज्यभरातून एकूण 477 शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला होता. उत्पादनक्षमता वाढीसाठी नवनवीन तंत्रज्ञान स्वीकारणाऱ्या आणि शेतीत सातत्याने प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात येते.

राज्यस्तरावर कोल्हापूर जिल्ह्यातील विजेत्या शेतकऱ्यांची माहिती पुढीलप्रमाणे आहे : Kharif Crop Competition 2025

पीकविजेता शेतकरीगाव / तालुकाउत्पादन (क्विंटल/हेक्टर)राज्य क्रमांक
सोयाबीननारायण गंगाधर पुजारीशिरोळ76.68द्वितीय
सोयाबीनजयश्री गणपती कुंभारअर्जुनवाड, कागल76.43तृतीय
भातसदाशिव चनगौंडा कतगरसुळकुड, कागल135.79प्रथम
भातबाबासो सायगौंडा पाटीलपिंपळगाव बु., कागल120.59द्वितीय
भुईमूगशिवाजी सदाशिव चौगलेअर्जुनवाडा, राधानगरी56.15प्रथम
भुईमूगदत्तात्रय बाळा कसलकरतमनाकवाडा, कागल56.14द्वितीय
नाचणीनारायण रामू कडूकरकेनिवाडी, चंदगड89.32प्रथम
नाचणीवसंत मनोहर शेटगेउकिर भाटले, भुदरगडद्वितीय
नाचणीधोंडिबा ओमान शिट्याळकरकरंजगाव, चंदगडतृतीय

भात उत्पादनामध्ये कागल तालुक्यातील सुळकुड येथील सदाशिव चनगौंडा कतगर यांनी प्रति हेक्टरी 135.79 क्विंटल उत्पादन घेत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. तसेच भुईमूग उत्पादनात राधानगरी तालुक्यातील अर्जुनवाडा येथील शिवाजी सदाशिव चौगले यांनी 56.15 क्विंटल प्रति हेक्टर उत्पादनासह राज्यात पहिला क्रमांक मिळवला. नाचणी उत्पादनात चंदगड तालुक्यातील केनिवाडी येथील नारायण रामू कडूकर यांनी 89.32 क्विंटल उत्पादन घेत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला.

या स्पर्धेसाठी विविध स्तरांवर रोख पारितोषिकांची व्यवस्था करण्यात आली आहे. तालुका स्तरावर प्रथम बक्षीस 5 हजार रुपये, द्वितीय 3 हजार रुपये आणि तृतीय 2 हजार रुपये दिले जाते. जिल्हास्तरावर प्रथम 10 हजार रुपये, द्वितीय 7 हजार रुपये आणि तृतीय 5 हजार रुपये बक्षीस दिले जाते. तर राज्यस्तरावर प्रथम क्रमांकासाठी 50 हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी 40 हजार रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी 30 हजार रुपयांचे पारितोषिक दिले जाते.

कृषि विभागामार्फत खरीप 2025 पीक स्पर्धेतील विजेत्या शेतकऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे. तसेच विजेत्या शेतकऱ्यांनी आपल्या उत्पादनातील सातत्य कायम ठेवून परिसरातील इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. खरीप हंगाम 2026 मधील पीक स्पर्धा योजनेत अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कृषि उपसंचालक नामदेव परीट आणि जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी जालिंदर पांगरे यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी सहाय्यक कृषि अधिकारी, उप कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी तसेच उपविभागीय कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन कृषि विभागाकडून करण्यात आले आहे.


ही माहिती सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहचवा