किसानवाणी | सहकाराची पाळमुळं पश्चिम महाराष्ट्रात खोलवर रूजलीत, पण हा सहकार कोकणात रूजवला आणि कोकणातील मेव्यावर प्रक्रिया केली, तर कोकणातील ग्रामीण अर्थकारण बदलू शकतं. मुंबईतील सहकारी बॅंकेत नोकरी केलेल्या विचारे यांनी हाच विचार करून, निवृत्तीनंतर रत्नागिरी कृषी प्रक्रिया सहकारी संस्थेची उभारणी केलीय. आज ते रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काजू उत्पादकांच्या काजूवर प्रक्रिया (Cashew Nut Processing Business) करून त्यांना चांगला दर मिळवून देताहेत. चला तर आज आपण कोकणातील ‘या’ सहकारी तत्वावर चालणाऱ्या प्रक्रिया उद्योगाची माहिती जाणून घेण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात जाऊया…
पुढील पाच दिवस विजांच्या गडगडाटासह गारपीट आणि पाऊस | शेती पिकांना फटका बसण्याची शक्यता | Weather Forecast
मुंबई | राज्यात ऐन रब्बी हंगामातील पिकांच्या काढणीचे काम अंतिम टप्प्यावर असताना अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये बळीराजा संकटात सापडला आहे. अशातच आता पुढचे 5 दिवस राज्यात मुसळधार पाऊस होणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून (Weather Forecast) देण्यात आली आहे. काल (१६ मार्चला) पाच वाजल्यापासून अनेक जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली आहे, अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची एकच धावपळ … Read more