दुष्काळाचा मोठा इशारा ! राज्य सरकारने तातडीने ‘ही’ योजना लागू करावी; डॉ. लाखे पाटील यांची मागणी | Drought Management

Drought Management

किसानवाणी : संभाव्य दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कोणताही विलंब न करता राज्य, जिल्हा आणि तालुका स्तरावरील दुष्काळ आपत्ती व्यवस्थापन योजना (Drought Management) तयार करून तिची तातडीने अंमलबजावणी सुरू करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे माजी तज्ज्ञ सदस्य तसेच शिवसेना सचिव डॉ. संजय लाखे पाटील यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मदत … Read more

PM Kisan | ३० जूनपूर्वी ई-केवायसी पूर्ण करा; अन्यथा पुढील हप्त्यांपासून वंचित राहण्याची शक्यता

PM Kisan

किसानवाणी : केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM Kisan) योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व पात्र शेतकऱ्यांसाठी वार्षिक ई-केवायसी (e-KYC) प्रमाणीकरण प्रक्रिया ३० जून २०२६ पूर्वी पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. निर्धारित मुदतीत ही प्रक्रिया पूर्ण न करणाऱ्या लाभार्थ्यांना योजनेच्या आगामी हप्त्यांपासून वंचित राहावे लागू शकते, असा स्पष्ट इशारा कृषी विभागाने दिला आहे. त्यामुळे संबंधित … Read more

‘एल निनो’चं संकट; जलयुक्त शिवार अभियान २.० साठी १७० कोटी मंजूर, ३४ जिल्ह्यांना प्रत्येकी ५ कोटी | Maharashtra El Nino Jalyukt Shivar Abhiyan 2.0

Maharashtra El Nino Jalyukt Shivar Abhiyan 2.0

किसानवाणी : राज्यात संभाव्य ‘एल निनो’च्या संकटामुळे निर्माण होऊ शकणाऱ्या पाणीटंचाईच्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. मृद व जलसंधारण विभागाने ‘जलयुक्त शिवार अभियान २.०’ (Maharashtra El Nino Jalyukt Shivar Abhiyan 2.0) अंतर्गत आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी १७० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून, राज्यातील ३४ जिल्ह्यांना प्रत्येकी ५ कोटी रुपयांचा निधी … Read more

पाण्याची किंमत किती असावी?; ठोक जलप्रशुल्क प्रस्तावावर ५ जूनपर्यंत हरकती मागवल्या… |Maharashtra Water Policy MWRRA

Maharashtra Water Policy MWRRA

किसानवाणी : राज्यातील पाणी वापरासाठी आकारण्यात येणाऱ्या ठोक जलप्रशुल्काच्या दरांबाबत महत्त्वाची प्रक्रिया सुरू झाली असून महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने (Maharashtra Water Policy MWRRA) चौथ्या ठोक जलप्रशुल्क प्रस्तावाचा (२०२६-२९) मसुदा जनतेसाठी उपलब्ध करून दिला आहे. या मसुद्यामध्ये आगामी तीन वर्षांसाठी विविध क्षेत्रांतील पाणी वापरासाठी आकारण्यात येणाऱ्या दरांबाबतचे निकष आणि प्रस्तावित शुल्क संरचना समाविष्ट करण्यात आली आहे. … Read more

भूमिहीन शेतमजुरांना मोठा दिलासा; सरकार देणार 2 ते 4 एकर जमीन | Maharashtra News Farm Land Distribution

Maharashtra News Farm Land Distribution

किसानवाणी : राज्यातील दारिद्रय रेषेखालील भूमिहीन शेतमजुरांसाठी राज्य सरकारकडून महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात येत असून अशा कुटुंबांना दोन ते चार एकर जमीन देण्याची योजना (Maharashtra News Farm Land Distribution) राबविण्याची तयारी सुरू आहे. अनेक वर्षांपासून स्वतःची शेती नसल्यामुळे मजुरीवर अवलंबून असलेल्या हजारो कुटुंबांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार असल्याचे बोलले जात आहे. ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल … Read more