किसानवाणी | शेतकऱ्यांना जमिनीत सेंद्रीय घटकांच्या वापराद्वारे जलधारण क्षमता वाढवण्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी गावोगावी घेण्यात येणाऱ्या सर्व पिकांच्या शेती शाळेच्या अभ्यासक्रमात जलधारण क्षमता तपासणी हा लघु प्रयोग समाविष्ट करण्यात आला आहे. चला तर पाहूया सातारा जिल्ह्यातील निसराळे गावात घेण्यात येत असलेल्या ऊस पिकाच्या शेती शाळेतील हा जमिनीची जलधारण क्षमता तपासणी प्रयोग.. (How to check water holding capacity of soil)
प्रधानमंत्री कुसुम योजनेबाबत महत्वाचं आवाहन, काय आहे ही योजना.. जाणून घ्या..! PM KUSUM YOJANA
मुंबई | नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय, नवी दिल्ली यांच्यामार्फत जुलै, 2019 व राज्य शासनामार्फत मे 2021 मध्ये पीएम कुसुम योजना (PM KUSUM YOJANA) निर्गमित करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रियाही पूर्णत: ऑनलाईन आहे. त्यामुळे या योजनेच्या नावाने शेतकऱ्यांना लाभार्थी हिस्सा भरण्यासाठी खोटे एसएमएस(SMS) प्राप्त झाल्यास त्यापासून लाभार्थ्यांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन महाराष्ट्र ऊर्जा … Read more