दुष्काळी जत तालुक्यात सफरचंदाची यशस्वी शेती | Successful apple cultivation in drought areas

किसानवाणी | नमस्कार शेतकरी बंधूनो, जर तुम्हाला सांगितलं की, थंड हवेच्या प्रदेशात येणारं सफरचंदाचं पीक महाराष्ट्रातील जतसारख्या दुष्काळी भागात देखील घेता येणं शक्य आहे? तर तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल.! हो ना..? कदाचित यावर विश्वास देखील बसणार नाही..! पण शेतकरी बंधूनो हे अगदी खरं आहे..! म्हणूनच आज आम्ही आपल्याला दुष्काळी जत तालुक्यातल्या सफरचंद शेतीची सफर घडवणार … Read more

‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजने’चा फायदा कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार? Namo Shetkari Mahasanman Fund Scheme

किसानवाणी | केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’ (Namo Shetkari Mahasanman Fund Scheme) राबवण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान केली. केंद्र सरकारच्या PM Kisan योजनेच्या धर्तीवर आखण्यात आलेली ही योजना नेमकी काय आहे? या योजनेसंदर्भातील काही महत्वाच्या बाबींविषयी आपण जाणून घेणार आहोत… … Read more

पीएम कुसुम सोलर योजनेअंतर्गत सौर पंप मिळवण्याची प्रक्रिया जाणून घ्या | Solar Pump Yojana

किसानवाणी | शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करता यावं, शेतीला पाणी देता यावं, यासाठी केंद्र सरकारनं पंतप्रधान कुसुम सोलर योजना (Solar Pump Yojana) आणली आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना सौर पंप दिले जातात. केंद्र आणि राज्य सरकार त्यासाठी अर्थसहाय्य करतं. या योजनेतून शेतकऱ्यांना 3, 5 आणि 7.5 HP क्षमतेचे सौर पंप दिले जातात. पात्र अर्जदार शेतकरी सर्वसाधारण प्रवर्गातील … Read more

रासायनिक खतांच्या किंमती वाढणार? ‘हे’ कारण आले समोर | Fertilizers Rate

किसानवाणी | डीएपीसारखी खते भारताला सवलतीच्या दरात बंद झाल्याने खतांच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. मागील वर्षी भारताला मोठ्या प्रमाणात डाय-अमोनियम फॉस्फेट (डीएपी) खत रशियन कंपन्यांकडून येत होते. परंतु यंदा रशियन कंपन्यांनी बाजारभावाप्रमाणे खते देण्याचा निर्णय घेतला आहे. रशियन कंपन्यांनी सवलीच्या दरातील खते देणे बंद केल्याने यामुळे भारतातील शेतकरी संकटात येण्याची भिती व्यक्त केली जात … Read more

विदर्भासह राज्यात पावसाचा जोर वाढणार | IMD Weather 2023

किसानवाणी | बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या पोषक प्रणालींमुळे विदर्भासह महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याचे संकेत आहेत. उद्या (ता. 13) पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा, तर उर्वरित विदर्भात विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात विजांसह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने (IMD Weather) वर्तविला आहे. दक्षिणेकडे सक्रिय असलेला मॉन्सूनचा आस जैसलमेर, शिवपूरी, रांची, दिघा ते … Read more

Kissan GPT : शेतकऱ्यांनो फक्त तुमचा प्रश्न विचारा; ‘किसान GPT’ देईल अचूक उत्तर; जाणून घ्या शेतकऱ्यांच्या फायद्याच्या ॲप बद्दल..

किसानवाणी | सध्या ChatGPT नावाचं AI तंत्रज्ञान खूपच लोकप्रिय होताना दिसतय..  जवळपास प्रत्येक क्षेत्राला या तंत्रज्ञानानं जोडण्याचं काम सुरू आहे. याच तंत्रज्ञानाच्या वापराने शेतकऱ्यांच्या समस्याही दूर करण्यासाठी प्रयत्न सूरू आहेत. त्याचाच भाग म्हणून नुकताच किसान GPT नावाचा AI चॅटबॉट सुरू करण्यात आलाय. शेती आणि शेतकऱ्यांसाठी हा Kissan GPT चॅटबॉट गेम चेंजर ठरू शकतो, असं कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांचं म्हणणं आहे. हा चॅटबॉट नेमकं कसं काम करतो आणि शेतकऱ्यांच्या कोणत्याही प्रश्नांची अचूक उत्तर कशी देतो हे जाणून घेणं गरजेचे आहे. चला तर जाणून घेऊया या ॲपबद्दल खालील व्हीडीओच्या माध्यमातून..

Farmer Long March : महाराष्ट्र सरकारकडून 70 टक्के मागण्या मान्य, शेतकरी मोर्चा स्थगित

किसानवाणी | किसान सभेचा लाँग मार्च अखेर स्थगित करण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या 70 टक्के मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचं समाधान झाल्याने मार्च (Farmer Long March) स्थगित करत असल्याची घोषणा आमदार जे. पी. गावित यांनी केली. शेतकऱ्यांनी 14 मागण्यांसाठी नाशिकपासून लाँन्ग मार्च काढला होता. मात्र, शेतकऱ्यांचा मोर्चा विधानभवनावर धडकण्यापुर्वीच सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यांवर काहीअंशी तोडगा … Read more

शेतजमीन, वहिवाटीचे वाद केवळ 2 हजार रुपयांत मिटणार, शासनाच्या ‘या’ अनोख्या योजनेबद्दल माहिती आहे का? | Government Scheme

किसानवाणी | महाराष्ट्रात शेतजमिनीच्या वादासंदर्भातील लाखो प्रकरणे न्यायालयांमध्ये प्रलंबित आहेत. त्यामुळे शेतजमिनीचा ताबा आणि वहिवाटीबाबत शेतकऱ्यांचे आपापसांतील वाद मिटविण्यासाठी राज्य शासनाने ‘सलोखा योजना’ आणली आहे. सलोखा योजनेची (Government Scheme Salokha Yojana) सविस्तर कार्यपद्धती सांगणारा शासन निर्णय महसूल विभागानं 3 जानेवारी 2023 रोजी जारी केला आहे. या योजनेत एका शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा दुसऱ्या शेतकऱ्याकडे आणि दुसऱ्या शेतकऱ्याच्या … Read more

शेतकरी लाँग मार्चमधील शेतकऱ्याचा ह्रदयद्रावक मृत्यू; आता तरी सरकार शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष देणार का?

मुंबई | शेतकरी लाँग मार्चच्या दरम्यान एका शेतकऱ्याचा अचानक मृत्यू झाला आहे. पुंडलिक अंबादास जाधव (वय ५५ वर्षे) असं मृत शेतकऱ्याचं नाव आहे. शेतकऱ्याची प्रकृती खालावली होती त्यामुळे त्याना रूग्ण्लयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांचा मृत्यू झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः या घटनेची माहिती दिली आहे. मृत शेतकऱ्याच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पाच … Read more

पुढील पाच दिवस विजांच्या गडगडाटासह गारपीट आणि पाऊस | शेती पिकांना फटका बसण्याची शक्यता | Weather Forecast

मुंबई | राज्यात ऐन रब्बी हंगामातील पिकांच्या काढणीचे काम अंतिम टप्प्यावर असताना अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये बळीराजा संकटात सापडला आहे. अशातच आता पुढचे 5 दिवस राज्यात मुसळधार पाऊस होणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून (Weather Forecast) देण्यात आली आहे. काल (१६ मार्चला) पाच वाजल्यापासून अनेक जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली आहे, अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची एकच धावपळ … Read more