दुष्काळाचा मोठा इशारा ! राज्य सरकारने तातडीने ‘ही’ योजना लागू करावी; डॉ. लाखे पाटील यांची मागणी | Drought Management

Drought Management

किसानवाणी : संभाव्य दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कोणताही विलंब न करता राज्य, जिल्हा आणि तालुका स्तरावरील दुष्काळ आपत्ती व्यवस्थापन योजना (Drought Management) तयार करून तिची तातडीने अंमलबजावणी सुरू करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे माजी तज्ज्ञ सदस्य तसेच शिवसेना सचिव डॉ. संजय लाखे पाटील यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मदत … Read more

अवकाळी पावसाने बाधित शेतकऱ्यांना दिलासा; शासनाकडून १४.५८ कोटींची मदत मंजूर | Maharashtra Farmers Relief Fund

Maharashtra Farmers Relief Fund

किसानवाणी : एप्रिल २०२६ मध्ये राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले असून त्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. बाधित शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत मिळावी यासाठी शासनाने १४ कोटी ५८ लाख ९० हजार रुपयांचा निधी मंजूर (अवकाळी पावसाने बाधित … Read more

Maharashtra Monsoon Session 2026 | २२ जूनपासून अधिवेशन; कर्जमाफी, शेतमालाचे भाव आणि महिला शेतकरी विधेयकावर जोरदार चर्चा…

Maharashtra Monsoon Session 2026

किसानवाणी : महाराष्ट्राच्या राजकारणातील अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा घडवून आणणाऱ्या राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचे (Maharashtra Monsoon Session 2026) वेळापत्रक निश्चित झाले आहे. विधानसभा कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात आला असून २२ जून ते १० जुलै २०२६ या कालावधीत मुंबई येथे हे अधिवेशन पार पडणार आहे. एकूण तीन आठवडे चालणाऱ्या या अधिवेशनात राज्यातील विविध … Read more

‘एल निनो’चं संकट; जलयुक्त शिवार अभियान २.० साठी १७० कोटी मंजूर, ३४ जिल्ह्यांना प्रत्येकी ५ कोटी | Maharashtra El Nino Jalyukt Shivar Abhiyan 2.0

Maharashtra El Nino Jalyukt Shivar Abhiyan 2.0

किसानवाणी : राज्यात संभाव्य ‘एल निनो’च्या संकटामुळे निर्माण होऊ शकणाऱ्या पाणीटंचाईच्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. मृद व जलसंधारण विभागाने ‘जलयुक्त शिवार अभियान २.०’ (Maharashtra El Nino Jalyukt Shivar Abhiyan 2.0) अंतर्गत आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी १७० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून, राज्यातील ३४ जिल्ह्यांना प्रत्येकी ५ कोटी रुपयांचा निधी … Read more

कृषी शिक्षण महागणार! पदवी अभ्यासक्रमाचे शुल्क ५४ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता…|Maharashtra Agriculture Universities

aharashtra Agriculture Universities

किसानवाणी : राज्यातील कृषी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आगामी शैक्षणिक वर्षापासून मोठा आर्थिक भार वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्यातील सर्व कृषी विद्यापीठांमधील (Maharashtra Agriculture Universities) पदवी, पदव्युत्तर पदवी तसेच आचार्य पदवी अभ्यासक्रमांच्या शैक्षणिक शुल्कात वाढ करण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असून, शासनाने नव्या शुल्क रचनेला मंजुरी दिल्यास कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या शुल्कात तब्बल ५४ टक्क्यांची वाढ होणार … Read more

“कर्जमाफी की फसवणूक? लाभासाठी यंदाचे कर्ज भरणे बंधनकारक; शेतकऱ्यांमध्ये संताप” | Ahilyadevi Holkar Loan Waiver

Ahilyadevi Holkar Loan Waiver

किसानवाणी : राज्य सरकारने मंजूर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेअंतर्गत (Ahilyadevi Holkar Loan Waiver) जाहीर करण्यात आलेल्या प्रोत्साहनपर लाभ योजनेबाबत नवीन अटी समोर आल्या असून, या अटींमुळे अनेक शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. सरकारने नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना जाहीर केली असली, तरी प्रत्यक्षात लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना यंदाच्या आर्थिक वर्षातील … Read more

पाण्याची किंमत किती असावी?; ठोक जलप्रशुल्क प्रस्तावावर ५ जूनपर्यंत हरकती मागवल्या… |Maharashtra Water Policy MWRRA

Maharashtra Water Policy MWRRA

किसानवाणी : राज्यातील पाणी वापरासाठी आकारण्यात येणाऱ्या ठोक जलप्रशुल्काच्या दरांबाबत महत्त्वाची प्रक्रिया सुरू झाली असून महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने (Maharashtra Water Policy MWRRA) चौथ्या ठोक जलप्रशुल्क प्रस्तावाचा (२०२६-२९) मसुदा जनतेसाठी उपलब्ध करून दिला आहे. या मसुद्यामध्ये आगामी तीन वर्षांसाठी विविध क्षेत्रांतील पाणी वापरासाठी आकारण्यात येणाऱ्या दरांबाबतचे निकष आणि प्रस्तावित शुल्क संरचना समाविष्ट करण्यात आली आहे. … Read more

शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! ‘ 2 लाखांपर्यंत ‘ कर्जमाफीची योजना लागू …|Maharashtra Karjmukti Yojana 2026

Maharashtra Karjmukti Yojana 2026

किसानवाणी : राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना’ (Maharashtra Karjmukti Yojana 2026) जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंतच्या पीक कर्जाची माफी देण्यात येणार असून नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याची तरतूद करण्यात आली आहे. कर्जमाफी, एकवेळ समझोता योजना तसेच प्रोत्साहनपर … Read more

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण आणि स्वाभिमान योजना; भूमिहीन शेतमजुरांसाठी मोठी संधी |The Karmaveer Dadasaheb Gaikwad Empowerment and Self-Respect Scheme

The Karmaveer Dadasaheb Gaikwad Empowerment and Self-Respect Scheme

किसानवाणी : राज्यातील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध समाजातील भूमिहीन शेतमजुरांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शासनाकडून “कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण आणि स्वाभिमान योजना” (The Karmaveer Dadasaheb Gaikwad Empowerment and Self-Respect Scheme) राबविण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना शेतीयोग्य जमीन खरेदी करून दिली जाते. ग्रामीण भागातील भूमिहीन कुटुंबांना स्वाभिमानाने जगण्याची संधी मिळावी, त्यांचे आर्थिक सक्षमीकरण व्हावे … Read more