खरीपासाठी खतांचा पुरेसा साठा; युरिया-डीएपी उत्पादनातही मोठी वाढ, केंद्राचा दावा |Urea DAP Fertilizer Stock

Urea DAP Fertilizer Stock

किसानवाणी : खरीप हंगामात खतांचा तुटवडा निर्माण होऊ नये, यासाठी केंद्र सरकारने (Urea DAP Fertilizer Stock) खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचा दावा केला आहे. एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत खरीप हंगामासाठी देशाची एकूण खतांची गरज ३८३.९० लाख टन इतकी असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. त्यापैकी २ जुलैपर्यंत १६३.३५ लाख टन, म्हणजेच सुमारे ४३ टक्के खतांचा … Read more

Sustainable Farming | एल-निनोच्या संकटात शेतकऱ्यांसाठी दिलासादायक उपाय; मूलस्थानी जलसंधारणातून शाश्वत शेती शक्य

Sustainable Farming

किसानवाणी : यंदाच्या खरीप हंगामावर एल-निनो हवामान प्रणालीचे सावट असल्याने राज्यातील अनेक भागांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याची तसेच दोन पावसांमधील खंड वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशा परिस्थितीत केवळ पावसाच्या प्रमाणावर अवलंबून न राहता जमिनीतील ओलावा जास्तीत जास्त काळ टिकवून ठेवणाऱ्या शेती पद्धतींचा अवलंब करणे आवश्यक ठरणार आहे. कृषी तज्ज्ञांच्या मते, योग्य पिकांची निवड, … Read more

१५ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात १६२४ कोटी जमा; नांदेडला सर्वाधिक भरपाई | PMFBY Pradhan Mantri Fasal Bima Yojana

PMFBY Pradhan Mantri Fasal Bima Yojana

किसानवाणी : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत (PMFBY Pradhan Mantri Fasal Bima Yojana) खरीप २०२५ हंगामात झालेल्या पिकांच्या नुकसानीपोटी राज्यातील १५ लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आतापर्यंत १६२४ कोटी रुपयांची भरपाई जमा करण्यात आली आहे. गेल्या खरीप हंगामात अतिवृष्टी, अवकाळी पाऊस तसेच इतर नैसर्गिक कारणांमुळे अनेक भागांतील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे नुकसानभरपाईची शेतकरी आतुरतेने … Read more

३० जूनची डेडलाइन हुकली! कर्जमाफी रखडल्याने पीककर्जाचा खोळंबा | Farm Loan Waiver Agriculture Loan Update

Farm Loan Waiver Agriculture Loan Update

किसानवाणी : राज्यातील शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात आलेल्या कर्जमाफीची अंमलबजावणी (Farm Loan Waiver Agriculture Loan Update) अद्याप स्पष्ट न झाल्याने खरीप हंगामाच्या तोंडावर मोठी अडचण निर्माण झाली आहे. सरकारने ३० जूनपूर्वी कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र मुदत उलटूनही अनेक शेतकऱ्यांची कर्जखाती ‘नील’ न झाल्याने त्यांना नवीन पीककर्ज मिळू शकलेले नाही. परिणामी राज्यातील अनेक … Read more

Maharashtra Rain Alert Konkan | कोकण-घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस; अकोल्यात अतिवृष्टी, खानदेशात भात लागवडीची चिंता

Maharashtra Rain Alert Konkan

किसानवाणी : राज्यात मान्सूनची चांगली प्रगती सुरू असली तरी पावसाचे वितरण (Maharashtra Rain Alert Konkan) अद्यापही असमान असल्याचे चित्र दिसून येत आहे. मंगळवारी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत राज्यातील बहुतांश भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. कोकण, घाटमाथा तसेच सातारा-कोयना परिसरात मात्र मध्यम ते जोरदार पावसाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्रात पावसाने खरीप पिकांना आधार … Read more

भात रोपवाटिकेसाठी नवे मार्गदर्शन; बीजप्रक्रिया, खत आणि ‘रहू’ पद्धतीची संपूर्ण माहिती | Paddy Crop Advisory Rahu Method

Paddy Crop Advisory Rahu Method

किसानवाणी : भात रोपवाटिकेची वेळेत पेरणी, योग्य खत व्यवस्थापन आणि मोड (Paddy Crop Advisory Rahu Method) आलेल्या बियाण्यांचा वापर केल्यास निरोगी रोपे तयार होऊन पुढील लागवडीस मोठी मदत होणार आहे. कोकण विभागातील ज्या भागांमध्ये खरीप हंगामातील भात रोपवाटिकेची पेरणी अद्याप पूर्ण झालेली नाही, त्या भागातील शेतकऱ्यांनी विलंब न करता गादी वाफ्यावर भात रोपवाटिकेची पेरणी सुरू … Read more

मुसळधार पावसाचा इशारा! कोकणातील शेतकऱ्यांनी तातडीने घ्या ‘ही’ काळजी; कृषी विभागाचा सल्ला.. | Konkan Agriculture Crop Advisory

Konkan Agriculture Crop Advisory

किसानवाणी : कोकण विभागातील शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाने महत्त्वपूर्ण पीक सल्ला (Konkan Agriculture Crop Advisory) जारी केला असून आगामी काळात मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा येण्याची शक्यता लक्षात घेऊन विविध पिकांसाठी आवश्यक उपाययोजनांची माहिती देण्यात आली आहे. विशेषतः नव्याने लागवड केलेल्या सुपारी व नारळाच्या रोपांचे तसेच आंबा आणि काजू कलमांचे वादळी वाऱ्यामुळे नुकसान होऊ नये यासाठी … Read more

यंदा बाजरी लागवडीचे तिहेरी फायदे; धान्य, चारा आणि दुष्काळापासून संरक्षण | Bajra Farming Pearl Millet

Bajra Farming Pearl Millet

किसानवाणी : यंदाच्या खरीप हंगामात बाजरीची लागवड शेतकऱ्यांसाठी तिहेरी फायदे देणारी ठरू शकते, कमी पाण्यातही चांगले उत्पादन देण्याची क्षमता , जनावरांसाठी पौष्टिक चारा आणि माणसांसाठी पोषक अन्नधान्य उपलब्ध करून देण्याची क्षमता यामुळे बाजरी हे पीक सध्याच्या बदलत्या हवामान परिस्थितीत अधिक महत्त्वाचे ठरत आहे. बाजरी हे मूळतः कोरडवाहू परिस्थितीसाठी योग्य मानले जाणारे पीक आहे. कमी पाऊस, … Read more

शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर ! 48 तासांत मोठा बदल; मॉन्सून पुन्हा सक्रिय ! |Monsoon Update Pune Weather

onsoon Update Pune Weather

किसानवाणी : राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली (Monsoon Update Pune Weather) असून अखेर दोन आठवड्यांच्या खंडानंतर मॉन्सूनने पुन्हा आगेकूच सुरू केली आहे. यंदा राज्यात ८ जून रोजी मॉन्सूनचे आगमन झाले होते. त्यावेळी मॉन्सूनने कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भाग व्यापला होता. मात्र त्यानंतर वातावरणातील बदल आणि पुढील वाटचालीसाठी आवश्यक असलेल्या पोषक परिस्थितीचा अभाव यामुळे … Read more

होर्मुज सामुद्रीधुनी खुली; शेतकऱ्यांना मोठा दिलासा! युरियाची 3.3 लाख टनांची खेप भारताकडे रवाना | Hormuz Strait Urea Supply

Hormuz Strait Urea Supply

किसानवाणी : खरीप हंगामाच्या तोंडावर देशातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून पश्चिम आशियातील भू-राजकीय घडामोडींमुळे खतांच्या आंतरराष्ट्रीय ( Hormuz Strait Urea Supply) पुरवठा साखळीवर परिणाम झाला होता. विशेषतः युरिया आणि डीएपीसारख्या महत्त्वाच्या खतांच्या वाहतुकीत अडथळे निर्माण झाल्याने आगामी खरीप हंगामात खतटंचाई निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र आता … Read more