Farm Loan Waiver Maharashtra| कर्जमाफीच्या प्रक्रियेला विलंब; तोपर्यंत व्याज आकारू नका, बँकांना आदेश

Farm Loan Waiver Maharashtra

राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, २०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना प्रत्यक्ष कर्जमाफीचा (Farm Loan Waiver Maharashtra) लाभ मिळेपर्यंत त्यांच्या पात्र थकीत पीक कर्जावर कोणतेही अतिरिक्त व्याज आकारू नये, असे स्पष्ट निर्देश राज्य सरकारने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि विविध कार्यकारी सहकारी संस्थांना दिले आहेत. यासंदर्भातील शासन आदेश सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागामार्फत … Read more

मत्स्यपालनात करिअरची मोठी संधी; B.F.Sc. पदवीने मिळतील सरकारी नोकरीपासून स्वतःच्या व्यवसायापर्यंत अनेक पर्याय | Aquaculture Fish Farming BFSc

Aquaculture Fish Farming BFSc

किसानवाणी : देशातील मत्स्य संवर्धन क्षेत्रात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर बदल होत असून हे क्षेत्र आता केवळ पारंपरिक मासेमारीपुरते मर्यादित राहिलेले नाही. आधुनिक तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान, वैज्ञानिक व्यवस्थापन आणि मूल्यवर्धित उत्पादनांवर आधारित उद्योग म्हणून मत्स्य व्यवसाय वेगाने विकसित होत आहे. केंद्र सरकारच्या ( Aquaculture Fish Farming BFSc) विविध योजनांमुळे या क्षेत्राला मोठी चालना मिळाली असून … Read more

Teak Rising Demand | सागवानाला वाढती मागणी; महाराष्ट्र सरकारच्या ऐतिहासिक निर्णयामुळे शेतकऱ्यांसाठी नवी संधी

Teak Rising Demand

किसानवाणी : महाराष्ट्राने सागवानावरील तोड निर्बंध हटवल्याने शेतकऱ्यांसाठी वनशेतीचे नवे दालन खुले; मात्र दर्जेदार रोपे, वैज्ञानिक व्यवस्थापन आणि पारदर्शक बाजारव्यवस्था यांची गरज कायम. महाराष्ट्र शासनाने ९ जून २०२६ रोजी घेतलेला एक महत्त्वपूर्ण निर्णय राज्यातील वनशेतीच्या दृष्टीने ऐतिहासिक ठरत आहे. महाराष्ट्र वृक्षतोड (नियमन) अधिनियम, १९६४ अंतर्गत साग किंवा सागवान (Teak Rising Demand) या प्रजातीला नियमनाधीन वृक्षांच्या … Read more

Farmer Compensation | अवकाळीग्रस्त १.३४ लाख शेतकऱ्यांना ३३४ कोटींची मदत मंजूर; डीबीटीने थेट खात्यात जमा होणार पैसे

Farmer Compensation

किसानवाणी : राज्यात ऑक्टोबर २०२५ ते एप्रिल २०२६ या कालावधीत अवकाळी पाऊस आणि कडाक्याच्या थंडीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीसाठी राज्य सरकारने मोठा (Farmer Compensation) निर्णय घेतला आहे. कोकणातील आंबा आणि काजू उत्पादकांसह राज्यातील विविध जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना एकूण ३३४ कोटी ९८ लाख रुपयांच्या मदतीला मंजुरी देण्यात आली असून ही रक्कम तातडीने लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे … Read more

७/१२ उताऱ्यांतील सर्वात मोठा घोटाळा! शेतकऱ्यांची फसवणूक, ४२४ बेकायदेशीर फेरफार प्रकरणे उघड | Satbara Scam 7/12 Land Record

Satbara Scam 712 Land Record

किसानवाणी : राज्यातील शेतकऱ्यांच्या जमिनींच्या ७/१२ उताऱ्यांमध्ये बेकायदेशीर फेरफार (Satbara Scam 7/12 Land Record) करून मोठ्या प्रमाणावर फसवणूक झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. शुद्धलेखन दुरुस्तीच्या नावाखाली महाराष्ट्र जमीन महसूल संहितेतील कलम १५५ चा गैरवापर करून जमिनींच्या नोंदींमध्ये विनापरवाना बदल करण्यात आल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणाची दखल विधानसभेत घेतली गेली असून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे … Read more

मोठी बातमी: खत लिंकिंगवर अखेर बंदी; शेतकऱ्यांना जबरदस्तीने इतर उत्पादने विकता येणार नाहीत | Maharashtra Fertiliser Linking Dattatray Bharane

Maharashtra Fertiliser Linking Dattatray Bharane

किसानवाणी : राज्यातील शेतकऱ्यांना अनुदानित खत खरेदी करताना इतर उत्पादने सक्तीने खरेदी करण्यास भाग पाडले जाण्याच्या तक्रारींची दखल घेत महाराष्ट्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. उत्तर प्रदेश सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्रातही अनुदानित खतांसोबत इतर उत्पादने ‘लिंकिंग’ करून विक्री करण्यास बंदी घालण्यात येणार असल्याची माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे (Maharashtra Fertiliser Linking Dattatray Bharane) यांनी विधानसभेत लेखी उत्तराद्वारे … Read more

कर्जमाफीतून 12.71 लाख शेतकरी वंचित? सरकारच्या अटींवर विधानसभेत मोठा गदारोळ | Maharashtra Farm Loan Waiver

Maharashtra Farm Loan Waiver

किसानवाणी : राज्य सरकारच्या प्रस्तावित कर्जमाफी योजनेतील (Maharashtra Farm Loan Waiver) अटींवरून विधानसभेत पुन्हा एकदा जोरदार राजकीय संघर्ष पाहायला मिळाला. २०१९ च्या कर्जमाफीतील निकष कायम ठेवल्यामुळे राज्यातील तब्बल १२ लाख ७१ हजार शेतकरी यंदाच्या कर्जमाफीपासून वंचित राहणार असल्याचा गंभीर आक्षेप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार कैलास पाटील यांनी मांडला. सरकारने घातलेल्या अटींमुळे मोठ्या संख्येने … Read more

सावधान! दूध, तूप, मसालेसह ‘या’ पदार्थांमध्ये होऊ शकते भेसळ; अशी करा शुद्धतेची ओळख | Food Safety Food Adulteration

Food Safety Food Adulteration

किसानवाणी : अन्न हे मानवाच्या आरोग्याचा पाया मानले जाते. निरोगी जीवनासाठी पौष्टिक, स्वच्छ आणि सुरक्षित अन्नाचे ( Food Safety Food Adulteration) सेवन करणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र वाढत्या बाजारपेठेमध्ये नफेखोरीच्या उद्देशाने अनेक खाद्यपदार्थांमध्ये भेसळ केली जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत. अन्नातील भेसळ ही केवळ ग्राहकांची फसवणूक नसून ती आरोग्यासाठी गंभीर धोका निर्माण करणारी समस्या … Read more

महिला शेतकऱ्यांना मिळणार कायदेशीर दर्जा? महाराष्ट्र सरकारचे मोठे पाऊल… | Women Farmers Maharashtra Agriculture

Women Farmers Maharashtra Agriculture

किसानवाणी : महाराष्ट्रातील कृषी क्षेत्रात महिलांचा (Women Farmers Maharashtra Agriculture) सहभाग ८१ टक्क्यांहून अधिक असल्याचे विविध अभ्यासांतून समोर आले आहे. पेरणीपासून कापणीपर्यंत, पशुपालनापासून दुग्ध व्यवसायापर्यंत आणि मत्स्यव्यवसायापासून कुक्कुटपालनापर्यंत ग्रामीण अर्थव्यवस्थेचा मोठा भार महिला सांभाळत असल्या तरी आजही त्यांना स्वतंत्र शेतकरी म्हणून मान्यता मिळालेली नाही. बहुतांश शासकीय योजना, कृषी धोरणे आणि अनुदान योजनांचा लाभ घेण्यासाठी जमिनीची … Read more

MahaBeej Recruitment 2026 | महाबीजमध्ये १९० कृषी सहायक पदांची भरती; कृषी पदवीधरांसाठी मोठी संधी

MahaBeej Recruitment 2026

किसानवाणी : महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (MahaBeej Recruitment 2026) मध्ये अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुधारित आकृतीबंधाला अखेर राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे महाबीजच्या प्रशासकीय आणि तांत्रिक कामकाजाला मोठी चालना मिळणार असून कृषी क्षेत्रातील युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. विशेष म्हणजे नव्या आकृतीबंधामध्ये कृषी सहायकांची तब्बल १९० पदे मंजूर … Read more