Sea Buckthorn Farming : ‘सुपरफूड’ सीबकथॉर्नची लागवड; कमी क्षेत्रातून मिळू शकते मोठी कमाई

Sea Buckthorn Farming

भारतातील शेतकरी आता पारंपरिक पिकांबरोबरच उच्च मूल्य असलेल्या फळपिकांकडे वळत आहेत. जागतिक बाजारपेठेत मोठी मागणी असलेल्या आणि ‘सुपरफूड’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सीबकथॉर्न (Sea Buckthorn Farming) या फळपिकाकडेही अनेकांचे लक्ष वेधले जात आहे. जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असलेले हे फळ आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक मानले जाते. त्यामुळे अन्नप्रक्रिया, औषधनिर्मिती आणि सौंदर्यप्रसाधन उद्योगात त्याची मागणी सातत्याने वाढत … Read more

पेट्रोल होणार स्वस्त? केंद्राचा मोठा निर्णय; इथेनॉल मिश्रित इंधनावरील कर पूर्ण माफ… | Ethanol Blended Petrol

Ethanol Blended Petrol

किसानवाणी : पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक तेल पुरवठा साखळीवर मोठा परिणाम झाला असून त्याचे पडसाद भारतातील इंधन बाजारावरही उमटताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होत असल्याने ग्राहकांवरील आर्थिक भार वाढला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेत इथेनॉलचे (Ethanol Blended Petrol) प्रमाण अधिक असलेल्या पेट्रोलवरील केंद्रीय उत्पादन शुल्क … Read more

‘सावधान शेतकऱ्यांनो’! खोडकिडीमुळे होऊ शकते मोठे नुकसान | Stem Borer Crop Protection

Stem Borer Crop Protection

किसानवाणी : पावसाळ्याच्या हंगामात विविध पिकांवर कीड व रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. त्यामध्ये खोडकिड (Stem Borer Crop Protection) ही शेतकऱ्यांसाठी मोठी डोकेदुखी ठरते. विशेषतः ऊस, मका, ज्वारी, बाजरी तसेच इतर काही नगदी व अन्नधान्य पिकांमध्ये खोडकिडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो. ही कीड पिकांच्या खोडामध्ये प्रवेश करून आतील भाग पोखरते. त्यामुळे पिकांची वाढ खुंटते, … Read more

“पाणीटंचाई टाळायची? मग ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’कडे दुर्लक्ष करू नका!” | Rainwater Harvesting

Rainwater Harvesting

किसानवाणी : राज्यातील अनेक भागांमध्ये दरवर्षी पुरेसा पाऊस पडत असला तरी पावसाचे पाणी योग्य प्रकारे साठवले जात नसल्याने उन्हाळ्याच्या काळात पाणीटंचाईची समस्या निर्माण होते. वाढती लोकसंख्या, भूजलाचा वाढता वापर, हवामान बदलाचे परिणाम आणि शेतीसाठी वाढती पाण्याची गरज यामुळे जलसंधारणाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. या पार्श्वभूमीवर ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ अर्थात पावसाच्या पाण्याचे संकलन आणि साठवण … Read more

“कमी जमीन, जास्त नफा; पॉलिहाउस उभारण्याआधी ही माहिती नक्की जाणून ‘घ्या’ | Polyhouse Farming

Polyhouse Farming

किसानवाणी : बदलत्या हवामानामुळे पारंपरिक शेतीसमोर अनेक आव्हाने निर्माण होत आहेत. अवकाळी पाऊस, गारपीट, उष्णतेच्या लाटा, थंडी तसेच वादळी वाऱ्यांमुळे पिकांचे मोठे नुकसान होत असल्याने शेतकरी पर्यायी आणि सुरक्षित शेती पद्धतींचा शोध घेत आहेत. अशा परिस्थितीत संरक्षित शेतीतील पॉलिहाउस (Polyhouse Farming) तंत्रज्ञान हे आधुनिक आणि प्रभावी साधन म्हणून पुढे येत आहे. पिकांना बाह्य हवामानाच्या प्रतिकूल … Read more

एरोबिक भात लागवड : कमी पाण्यात भात उत्पादनाचा प्रभावी आणि फायदेशीर पर्याय | Aerobic Rice

Aerobic Rice

किसानवाणी : पारंपरिक भात लागवड पद्धतीमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते. मात्र बदलते हवामान, पावसातील अनिश्चितता आणि वाढती पाण्याची टंचाई यामुळे शेतकऱ्यांसमोर भात उत्पादन टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत एरोबिक भात (Aerobic Rice) लागवड पद्धत ही कमी पाण्यात भाताचे उत्पादन घेण्यासाठी एक प्रभावी पर्याय म्हणून पुढे येत आहे. या पद्धतीत शेत … Read more

एआय आणि कृषिपुत्रांची युती; शेतीतील आव्हानांवर तंत्रज्ञानाधारित उपायांचा मार्ग | AI in Farming

AI in Farming

किसानवाणी : कृषी क्षेत्रातील वाढती आव्हाने, हवामान बदल, उत्पादन खर्चातील वाढ आणि शेतकऱ्यांसमोरील विविध तांत्रिक अडचणी लक्षात घेता कृत्रिम बुद्धिमत्ता (AI in Farming), इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT), डेटा ॲनालिटिक्स आणि ड्रोनसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्याची आवश्यकता दिवसेंदिवस अधोरेखित होत आहे. मात्र कृषी क्षेत्रातील समस्या आणि अशा अत्याधुनिक तंत्रज्ञानाची प्रभावी सांगड घालण्यात देशातील अनेक शैक्षणिक संस्था … Read more

अकोल्यात वादळाने केळी बागांचे मोठे नुकसान; सर्व्हर समस्येमुळे भरपाईवर प्रश्नचिन्ह | Banana Farmers Farm Losses

Banana Farmers Farm Losses

किसानवाणी :अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात १ जून रोजी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक गावांमधील केळी बागा (Banana Farmers Farm Losses) पूर्णपणे जमीनदोस्त झाल्याने शेतकऱ्यांसमोर गंभीर आर्थिक संकट उभे राहिले आहे. आधीच उत्पादन खर्च, मजुरी आणि हवामानातील अनिश्चितता यामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना आता नुकसानभरपाई मिळण्याबाबतही अनिश्चिततेचा सामना करावा लागत … Read more

गारपीटीनंतर उसात रोगांचा धोका वाढला; शेतकऱ्यांनी तातडीने करा हे उपाय |Disease Control

Disease Control

किसानवाणी : मागील काही दिवसांपासून हवामानात अचानक बदल होत असून अनेक ऊस उत्पादक भागांमध्ये वादळी वारे, अवकाळी पाऊस आणि गारपीट अशा परिस्थितीचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. या बदलत्या हवामानाचा थेट परिणाम ऊस पिकाच्या वाढीवर आणि उत्पादनक्षमतेवर होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून (Disease Control) व्यक्त करण्यात येत आहे. विशेषतः गारपीट आणि वादळी वाऱ्यांमुळे उसाच्या पानांचे मोठ्या प्रमाणावर … Read more

“एल निनोचा फळबागांवर धोका; कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा” | El Nino

El Nino

किसानवाणी : एल निनोच्या (El Nino) संभाव्य प्रभावामुळे फळपिकांवर होणारे दुष्परिणाम आणि त्यावरील प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत कृषी विभागाने जनजागृती मोहीम सुरू केली आहे. बदलत्या हवामान परिस्थितीत फळबागांचे संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांनी योग्य नियोजन करावे, असे आवाहन प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एस. एम. साळवे यांनी केले आहे. श्री. साळवे यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत महासागरातील तापमानात होणारी वाढ … Read more